शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

शाळकरी मुलींच्या ‘अस्मिता’ला घरघर; ‘सॅनिटरी नॅपकिन’च्या पुरवठ्याबद्दल यंत्रणा अनभिज्ञ

By विजय सरवदे | Updated: October 18, 2022 18:04 IST

‘सॅनिटरी नॅपकिन’च्या पुरवठ्याकरिता पहिल्या तीन वर्षांसाठी शासनाचा तीन पुरवठादार संस्थांसोबत करार झाला होता.

- विजय सरवदेऔरंगाबाद : मासिक पाळीच्या काळात शालेय किशोरवयीन मुली आणि ग्रामीण भागातील महिलांनी स्वच्छतेबाबत आवश्यक दक्षता घ्यावी. त्यांनी ‘सॅनिटरी नॅपकिन’चा वापर करावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘अस्मिता योजने’ला मागील आठ महिन्यांपासून घरघर लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुली व महिलांच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता आहे. मासिक पाळीच्या काळात ग्रामीण भागातील महिला-मुलींमध्ये देखील स्वच्छतेबाबत सजगता यावी म्हणून तत्कालीन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘अस्मिता योजना’ सुरू केली होती. मार्च २०१८ मध्ये ही योजना सुरू झाली. २०१९ पर्यंत ही योजना विनाव्यत्यय राबविण्यात आली. मात्र, २०२० मध्ये कोरोना पसरला. ‘लॉकडाऊन’ झाले आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. सप्टेंबर २०२१ पर्यंत ‘सॅनिटरी नॅपकिन’चा पुरवठा होऊ शकला नाही.

दरम्यान, ‘सॅनिटरी नॅपकिन’च्या पुरवठ्याकरिता पहिल्या तीन वर्षांसाठी शासनाचा तीन पुरवठादार संस्थांसोबत करार झाला होता. त्यापैकी कमी गुणवत्तेच्या ‘सॅनिटरी नॅपकिन’चा पुरवठा केल्यामुळे एका पुरवठादाराला ‘ब्लॅक लिस्टेड’ करण्यात आले. परिणामी, दोन पुरवठादारांकडून ‘सॅनिटरी नॅपकिन’चा नियमित पुरवठा होत होता. त्यानंतर मार्च २०२२ मध्ये पुरवठादारांचा करार संपल्यानंतर नवा करार अद्याप झालेलाच नाही. त्यामुळे आठ महिन्यांपासून ‘सॅनिटरी नॅपकिन’च्या या योजनेला घरघर लागली. तथापि, ही योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राबविली जात असून या यंत्रणेलाही ग्रामीण भागातील मुली व महिलांच्या या लोकोपयोगी योजनेबद्दल तेवढे गांभीर्य दिसत नाही. या यंत्रणेचे काही अधिकारी म्हणतात, पुरवठा चालू आहे, तर काही अधिकारी सांगतात, ‘अस्मिता पोर्टल’ बंद असल्यामुळे बचत गटांना ‘सॅनिटरी नॅपकिन’ची मागणी नोंदवण्यास अडचण येत असून मार्चपासून जिल्ह्याला पुरवठाच झालेला नाही.

किती झाला पुरवठा?ही योजना महिला बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येत होती. ही योजना राबविण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार ३७१ गावांसाठी १ हजार ३७४ महिला बचत गटांनी नोंदणी केलेली आहे. मार्च २०२२ पूर्वी या बचत गटांनी नोंदणी केल्यानुसार ‘सॅनिटरी नॅपकिन’च्या ६५३ बॉक्सचा पुरवठा झाला व त्याची शालेय किशोरवयीन मुली व महिलांना विक्री करण्यात आली आहे.

काय आहे ही योजना?मासिक पाळीच्या काळात ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत आवश्यक दक्षता घेतली जात नसल्याचे एका सर्वेक्षणामध्ये समोर आले होते. त्यामुळे तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेऊन ‘अस्मिता योजना’ सुरू केली. जिल्हा परिषद शाळांतील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींना आठ ‘सॅनिटरी नॅपकिन’ असलेला एक बॉक्स ५ रुपयाला, तर ग्रामीण महिलांना २४ आणि २९ रुपये सवलतीच्या दरात याचा लाभ दिला जात होता. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदzp schoolजिल्हा परिषद शाळा