शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कृतज्ञतेचा सोहळा

By admin | Updated: September 23, 2014 01:39 IST

औरंगाबाद : ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले, आज त्यांचे विद्यार्थी देश-विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.

औरंगाबाद : ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले, आज त्यांचे विद्यार्थी देश-विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी कधीच भेदभाव न करता सर्वांना आपल्याकडील ज्ञान भरभरून दिले. ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या साने गुरुजींनी दाखविलेल्या मार्गानुसार त्यांनी सर्व विद्यार्थ्यांवर समान प्रेम केले. अशा गुरुजनांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कृतज्ञतेचा हा हृद्य सोहळा उपस्थितांनी अनुभवला...प्रसंग होता विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्याचा. ज्यांनी ज्ञानदानाद्वारे दोन सुसंस्कृत पिढ्या घडविल्या. अनेक जुने विद्यार्थी रस्त्यात भेटल्यावर त्यांना वाकून नमस्कार करतात; पण या गुरुजनांनी कधीच याचा गर्व बाळगला नाही. कधी कोणता पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न केले नाहीत. अशा ज्येष्ठ शिक्षक, प्राध्यापक तसेच सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचा मिलाफ या सोहळ्याच्या निमित्ताने बघावयास मिळाला. या कौटुंबिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले माजी प्राचार्य शरद पिंगळे, निवृत्त प्राध्यापक डॉ. नीळकंठ बापट, सुशीलाताई अभ्यंकर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश देशपांडे.ज्ञानाधिष्ठित समाज घडविण्याचे कार्य करणाऱ्या ब्राह्मण समाजातील शिक्षक, प्राध्यापकांचा मान्यवर सत्कार करीत होते तेव्हा प्रत्येक जण टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या प्रती आपला कृतज्ञतेचा भाव व्यक्त करीत होता. समाजबांधवांनी केलेला आमचा सन्मान आमच्यासाठी राष्ट्रपतीपदकापेक्षा मोठा आहे, अशा भावना सत्कारमूर्र्तींनी व्यक्त केल्या. त्यावेळी सर्वांचे हृदय अभिमानाने भरून आले होते. मोडी लिपीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी समाजातील सर्व संघटनांनी पुढे यावे, असे आवाहन काही शिक्षकांनी केले. त्याचवेळी ब्राह्मण युवकांनी गुणवत्तेच्या आधारावर यापुढेही यशोशिखर गाठत राहावे, असा आशीर्वाद काही शिक्षकांनी दिला. प्रमुख पाहुणे नीळकंठ बापट यांनी ज्ञानी मानुष्य कसा असतो याचे सर्वोत्तम उदाहरण भाषाशास्त्रज्ञ अशोक केळकर होते, असे सांगत त्यांचा आदर्श सर्वांनी आत्मसात करावा, असे आवाहन केले. प्रारंभी, अशोक केळकर यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. प्रास्ताविक सतीश शिरडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अर्चना जोशी व ए.पी. कुलकर्णी यांनी केले. सोहळा यशस्वीतेसाठी कुमार कुलकर्णी, सुहास सहस्रबुद्धे, अनुराधा कुलकर्णी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.