शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

कृतज्ञतेचा सोहळा

By admin | Updated: September 23, 2014 01:39 IST

औरंगाबाद : ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले, आज त्यांचे विद्यार्थी देश-विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.

औरंगाबाद : ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले, आज त्यांचे विद्यार्थी देश-विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी कधीच भेदभाव न करता सर्वांना आपल्याकडील ज्ञान भरभरून दिले. ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या साने गुरुजींनी दाखविलेल्या मार्गानुसार त्यांनी सर्व विद्यार्थ्यांवर समान प्रेम केले. अशा गुरुजनांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कृतज्ञतेचा हा हृद्य सोहळा उपस्थितांनी अनुभवला...प्रसंग होता विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्याचा. ज्यांनी ज्ञानदानाद्वारे दोन सुसंस्कृत पिढ्या घडविल्या. अनेक जुने विद्यार्थी रस्त्यात भेटल्यावर त्यांना वाकून नमस्कार करतात; पण या गुरुजनांनी कधीच याचा गर्व बाळगला नाही. कधी कोणता पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न केले नाहीत. अशा ज्येष्ठ शिक्षक, प्राध्यापक तसेच सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचा मिलाफ या सोहळ्याच्या निमित्ताने बघावयास मिळाला. या कौटुंबिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले माजी प्राचार्य शरद पिंगळे, निवृत्त प्राध्यापक डॉ. नीळकंठ बापट, सुशीलाताई अभ्यंकर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश देशपांडे.ज्ञानाधिष्ठित समाज घडविण्याचे कार्य करणाऱ्या ब्राह्मण समाजातील शिक्षक, प्राध्यापकांचा मान्यवर सत्कार करीत होते तेव्हा प्रत्येक जण टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या प्रती आपला कृतज्ञतेचा भाव व्यक्त करीत होता. समाजबांधवांनी केलेला आमचा सन्मान आमच्यासाठी राष्ट्रपतीपदकापेक्षा मोठा आहे, अशा भावना सत्कारमूर्र्तींनी व्यक्त केल्या. त्यावेळी सर्वांचे हृदय अभिमानाने भरून आले होते. मोडी लिपीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी समाजातील सर्व संघटनांनी पुढे यावे, असे आवाहन काही शिक्षकांनी केले. त्याचवेळी ब्राह्मण युवकांनी गुणवत्तेच्या आधारावर यापुढेही यशोशिखर गाठत राहावे, असा आशीर्वाद काही शिक्षकांनी दिला. प्रमुख पाहुणे नीळकंठ बापट यांनी ज्ञानी मानुष्य कसा असतो याचे सर्वोत्तम उदाहरण भाषाशास्त्रज्ञ अशोक केळकर होते, असे सांगत त्यांचा आदर्श सर्वांनी आत्मसात करावा, असे आवाहन केले. प्रारंभी, अशोक केळकर यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. प्रास्ताविक सतीश शिरडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अर्चना जोशी व ए.पी. कुलकर्णी यांनी केले. सोहळा यशस्वीतेसाठी कुमार कुलकर्णी, सुहास सहस्रबुद्धे, अनुराधा कुलकर्णी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.