शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

कृतज्ञतेचा सोहळा

By admin | Updated: September 23, 2014 01:39 IST

औरंगाबाद : ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले, आज त्यांचे विद्यार्थी देश-विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.

औरंगाबाद : ज्यांनी आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले, आज त्यांचे विद्यार्थी देश-विदेशात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांनी कधीच भेदभाव न करता सर्वांना आपल्याकडील ज्ञान भरभरून दिले. ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या साने गुरुजींनी दाखविलेल्या मार्गानुसार त्यांनी सर्व विद्यार्थ्यांवर समान प्रेम केले. अशा गुरुजनांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कृतज्ञतेचा हा हृद्य सोहळा उपस्थितांनी अनुभवला...प्रसंग होता विश्व ब्राह्मण सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित कृतज्ञता सोहळ्याचा. ज्यांनी ज्ञानदानाद्वारे दोन सुसंस्कृत पिढ्या घडविल्या. अनेक जुने विद्यार्थी रस्त्यात भेटल्यावर त्यांना वाकून नमस्कार करतात; पण या गुरुजनांनी कधीच याचा गर्व बाळगला नाही. कधी कोणता पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न केले नाहीत. अशा ज्येष्ठ शिक्षक, प्राध्यापक तसेच सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचा मिलाफ या सोहळ्याच्या निमित्ताने बघावयास मिळाला. या कौटुंबिक सोहळ्याचे साक्षीदार ठरले माजी प्राचार्य शरद पिंगळे, निवृत्त प्राध्यापक डॉ. नीळकंठ बापट, सुशीलाताई अभ्यंकर, संस्थेचे अध्यक्ष सुरेश देशपांडे.ज्ञानाधिष्ठित समाज घडविण्याचे कार्य करणाऱ्या ब्राह्मण समाजातील शिक्षक, प्राध्यापकांचा मान्यवर सत्कार करीत होते तेव्हा प्रत्येक जण टाळ्यांचा कडकडाट करून त्यांच्या प्रती आपला कृतज्ञतेचा भाव व्यक्त करीत होता. समाजबांधवांनी केलेला आमचा सन्मान आमच्यासाठी राष्ट्रपतीपदकापेक्षा मोठा आहे, अशा भावना सत्कारमूर्र्तींनी व्यक्त केल्या. त्यावेळी सर्वांचे हृदय अभिमानाने भरून आले होते. मोडी लिपीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी समाजातील सर्व संघटनांनी पुढे यावे, असे आवाहन काही शिक्षकांनी केले. त्याचवेळी ब्राह्मण युवकांनी गुणवत्तेच्या आधारावर यापुढेही यशोशिखर गाठत राहावे, असा आशीर्वाद काही शिक्षकांनी दिला. प्रमुख पाहुणे नीळकंठ बापट यांनी ज्ञानी मानुष्य कसा असतो याचे सर्वोत्तम उदाहरण भाषाशास्त्रज्ञ अशोक केळकर होते, असे सांगत त्यांचा आदर्श सर्वांनी आत्मसात करावा, असे आवाहन केले. प्रारंभी, अशोक केळकर यांना सर्वांनी श्रद्धांजली वाहिली. प्रास्ताविक सतीश शिरडकर यांनी केले, तर सूत्रसंचालन अर्चना जोशी व ए.पी. कुलकर्णी यांनी केले. सोहळा यशस्वीतेसाठी कुमार कुलकर्णी, सुहास सहस्रबुद्धे, अनुराधा कुलकर्णी आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.