शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

पीकविम्याकडे पाठ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:09 IST

नुकसानभरपाई मिळत नसल्याने व मिळालीच तर अशा शेतकºयांची संख्या कमी असल्याने यंदा पीकविमा भरण्यास शेतकरी उदासीन असल्याचे दिसून आले

स.सो. खंडाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नुकसानभरपाई मिळत नसल्याने व मिळालीच तर अशा शेतकºयांची संख्या कमी असल्याने यंदा पीकविमा भरण्यास शेतकरी उदासीन असल्याचे दिसून आले. त्यामुळेच गतवर्षी ६ लाख ४३ हजार शेतकºयांनी पीकविमा भरला असताना यंदा मात्र अवघ्या १ लाख २८ हजार ९१० शेतकºयांनी पीकविमा भरण्यात रुची दाखवली. जिल्हा बँकेकडे यंदा फक्त १२ कोटी ३२ लाख रुपयेच भरण्यात आले. गतवर्षी हा आकडा २४ कोटींचा होता.१० आॅगस्टपर्यंत पीकविमा भरण्याची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी पुन्हा करण्यात आली होती. मात्र, ती एकदाच ३१ जुलैनंतर ५ आॅगस्टपर्यंत वाढविण्यात आली. शेतकºयांनी पीकविमा आॅनलाइन भरावा, असे अपेक्षित होते. मात्र, राष्टÑीयीकृत बँकांचे सॉफ्टवेअर बंद पडल्याने शेतकºयांची अडचण झाली. राष्टÑीयीकृत बँका हा पीकविमा भरून घेण्यास उत्सुक नसल्याची चर्चाही आता ऐकावयास मिळत आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १३८ शाखांमधून आॅफलाइन का होईना पीकविमा भरून घेण्यात आला.गतवर्षी ६ लाख ४३ हजार शेतकºयांनी २४ कोटींचा पीकविमा भरला असतानाही फक्त ४७ हजार शेतकºयांना ७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळाली. त्याच्या आधीच्या वर्षीही नुकसानभरपाई ६३ कोटी रुपयांची देण्यात आली होती. नुकसानभरपाई कमी मिळू लागल्यामुळेच यंदा शेतकºयांनी पीकविमा भरण्याकडे पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे. राज्य सहकारी ग्रामीण बँकेकडे काही शेतकºयांनी पीकविमा भरला. बाकीच्या बँकांमध्ये पीकविमा भरून घेतला गेला नाही, अशी माहिती मिळाली आहे.औरंगाबाद जिल्ह्यात सोयाबीनचे पीक नाही. मका जास्त आहे. हिंगोली जिल्ह्यात मूग, उडदाचे पीक जास्त घेतले जाते. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन व तुरीचे उत्पादन जास्त होते. पीकपेरा आणि नुकसानभरपाईत आलेले पीक यावर रक्कम मिळत असते. ५० पैसे आणेवारीची तर अट आहेच.