शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

चुकीच्या पत्त्याने घेतली ‘परीक्षा’

By admin | Updated: December 28, 2015 00:24 IST

औरंगाबाद : राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा देण्यासाठी आलेले शेकडो विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशपत्रावरील चुकीच्या पत्त्यामुळे रविवारी मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

औरंगाबाद : राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा देण्यासाठी आलेले शेकडो विद्यार्थी आणि पालकांना प्रवेशपत्रावरील चुकीच्या पत्त्यामुळे रविवारी मोठा मनस्ताप सहन करावा लागला. चुकीच्या पत्त्यामुळे केंद्राची शोधाशोध करताना त्यांचा गोंधळ उडाला. दोन-तीन तास शोधाशोध करून अनेकांनी परीक्षा केंद्र गाठले; परंतु अशा परिस्थितीत विलंब झाल्याने अनेकांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर ‘सीबीएसई’तर्फे घेण्यात आलेल्या नेट परीक्षेसाठी मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसेच लगतच्या नगर, जळगाव, बुलडाणा या जिल्ह्यांतून परीक्षार्थी व पालक आले होते. रेल्वेस्थानक, बसस्थानकावरून आॅटोरिक्षा करून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी निघाले; परंतु प्रवेशपत्रांवरील चुकीच्या पत्त्यांमुळे त्यांची धांदल उडाली. दोन ते तीन तास परीक्षा केंद्र शोधण्याची वेळ आली. त्यातच वेळ गेल्याने परीक्षार्थींना परीक्षेपासून वंचित राहावे लागले. अर्धवट पत्त्यामुळे परीक्षार्थीचे हाल झाले. अनेक दिवसांपासून तयारी करूनही परीक्षा देता आली नाही. त्यामुळे परीक्षेची पूर्ण तयारी करून आलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सूर होता. पत्ता विचारत परीक्षा केंद्रावर पोहोचलो. मात्र, वेळ झाल्याने परीक्षेला मुकावे लागले. प्रवेशपत्रांवर चुकीचा पत्ता टाकण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.तीन तास शोधाशोधदेवळाई तांडा येथील स्कॉलर्स व्हॅली स्कूल या सेंटरवरील परीक्षार्थींना चुकीच्या पत्त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. प्रवेशपत्रावर देवळाई, सातारा परिसर असे नमूद करण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात हे केंद्र देवळाई तांडा येथे होते. अनेकांनी संपूर्ण सातारा परिसर बघितला. त्यात वेळ गेला. सकाळी साडेनऊ वाजता पहिला पेपर होता. त्यामुळे किमान नऊ वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक होते; परंतु हॉलतिकिटावरील पत्ता शोधताना परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांची पळापळ झाली. दोन-तीन तास शोधाशोध केल्यानंतर परीक्षार्थींना पत्ता सापडला. चुकीचा पत्ता असतानाही परीक्षार्थींनी केंद्राचा पत्ता शोधून काढला; परंतु काहींना केंद्रापर्यंत पोहोचण्यास विलंब झाला. सकाळी ९.३५ वाजता पोहोचलेल्या विद्यार्थ्यांसाठी गेट बंद करण्यात आले. त्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले. चुकीच्या पत्त्यामुळे झालेल्या मनस्तापाविषयी विद्यार्थ्यांनी ‘यूजीसी’कडे तक्रार केली आहे. रेल्वेने शहरात आल्यावर रिक्षा केली; परंतु चुकीच्या पत्त्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दोन तास शोधाशोध करावी लागली. रिक्षाला २०० रुपये मोजावे लागले. सेंटर परिसरात साधी खाद्यपदार्थांचीही सोय नव्हती. असे नांदेड येथून आलेले परीक्षार्थीचे भाऊ नवीद पठाण यांनी सांगितले.