शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दहा गावांना मिळणार शुद्ध पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:18 IST

नांदेड : जिल्ह्यातील दूषित पाणी पिणाऱ्या १० गावांतील नागरिकांना आता शुद्ध पाणी मिळणार असून यासाठी ४८ लाख ८६ हजार रूपये खर्च होणार आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यातील दूषित पाणी पिणाऱ्या १० गावांतील नागरिकांना आता शुद्ध पाणी मिळणार असून यासाठी ४८ लाख ८६ हजार रूपये खर्च होणार आहेत़ जलस्वराज- २ व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, टंचाईग्रस्त गावांतील टंचाई कालावधीसाठी साठवण टाक्या उभारणीचे प्रकल्प, पाणी गुणवत्ता बाधित गावांसाठी पाणी शुद्धीकरण संयंत्र (आरओ) उभारणीच्या १७ गावांतील प्रकल्पाच्या भूमिपूजनाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता या कामांना सुरूवात करण्यात आली आहे़ जलस्वराज प्रकल्प टप्पा- २ अंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पाणी तपासणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणे, पाणी गुणवत्ता विषयक सनियंत्रण माहिती प्रणाली तयार करणे, पाणी गुणवत्ता बाधित गावांत उपाययोजना करणे, संवाद व क्षमताबांधणी उपक्रम करणे आदी कामे हाती घेण्यात आली आहेत़ तसेच लोकांमध्ये स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठ्यााबत तसेच अशुद्ध पाण्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जनजागृती वाढविण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील किनवट, माहूर, धर्माबाद, मुखेड व लोहा तालुक्यातील अनेक गावे दूषित पाणी बाधित आहेत़ तर अनेक वस्ती, तांड्यावर पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे़ या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या सहायाने सोडविण्यात येणार आहे़ पाणी गुणवत्ता बाधित गावांपैकी किनवट तालुक्यातील- दूधगाव, येंदा, शनिवारपेठ, सिरमेटी, देगलूर- मुजळगा, धमार्बाद- रामपूर, रामेश्वर, बिलोली- कोळगाव व माहूर तालुक्यातील अंजनखेड, वाई, पाणीटंचाईग्रस्त ५ गावे - किनवट तालुक्यातील- आमरसिंग नाईक तांडा, मुखेड- -फत्तुतांडा, मानसिंग तांडा, व लोहा- चित्रातांडा, सोनमांजरीतांडा या गावांत पाणी शुद्धीकरण संयंत्र उभारण्यात येणार आहेत़ टंचाईग्रस्त गावांपैकी किनवट तालुक्यातील आमरसिंग नाईकतांडा, मुखेड तालुक्यात किशन तांडा, फत्तुतांडा, मानसिंगतांडा, वाल्मिकवाडी, विठ्ठलवाडी, सिद्धनाथ, लोहा तालुक्यात आम्रतातांडा, उमला तांडा, चित्रातांडा, थावरातांडा, परसरामतांडा, सोनमांजरीतांडा या तेरा गावांत साठवण टाक्या बसविण्यात येणार आहेत़ दूषित पाणी पिणाऱ्या गावांत पाणी शुद्धीकरण संयंत्र बसविण्यासाठी ४८ लाख ८६ हजार रूपये खर्च करण्यात येणार आहेत़ यामध्ये रामपूर व रामेश्वरसाठी ३ लाख ९ हजार , कोळगाव-४ लाख २ हजार, सिरमेटी-५ लाख ७ हजार, अंजनखेड- ६ लाख १ हजाऱ मुजळगा- ४ लाख ८ हजार, येंदा -४ लाख २ हजार, दूधगाव- ४ लाख २ हजार, शनिवारपेठ- ५ लाख ७ हजार, वाई- ६ लाख १ हजाऱ जिल्हा परिषद आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्यावतीने ही कामे केली जाणार आहेत़