शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

खून प्रकरणात दहा जणांचे जबाब

By admin | Updated: January 15, 2016 23:38 IST

नांदेड : बारड येथील रहिवासी आणि सहयोग संकुलात प्राध्यापक असलेल्या कपिल भिमेवार खून प्रकरणाला सूत्रधार नंदू गोडसेच्या आत्महत्येनंतर वेगळीच कलाटणी मिळाली आहे़

नांदेड : बारड येथील रहिवासी आणि सहयोग संकुलात प्राध्यापक असलेल्या कपिल भिमेवार खून प्रकरणाला सूत्रधार नंदू गोडसेच्या आत्महत्येनंतर वेगळीच कलाटणी मिळाली आहे़ गोडसेने लिहिलेल्या मृत्युपूर्वी चिठ्ठीवरुन लातूर पोलिस पथकाने बारड येथील दहा जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत़ यातील नावांचा खून प्रकरणाची संबंध आहे किंवा केवळ राजकीय वैमनस्यातून ती टाकण्यात आली याबाबतची सत्यता पोलिस पडताळून पाहत आहेत़२९ डिसेंबर रोजी प्रा़ कपिल भिमेवार याचे प्रेत असदवन शिवारात सापडले होते़ याप्रकरणात तीन आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार असलेल्या नंदू गोडसे याने लातूर जिल्ह्यातील देवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्या केली आहे़ या आत्महत्येसाठी गोडसे याने नवीन दोर विकत घेतला होता़ तसेच त्याच्या पोटाला बांधलेल्या डायरीत त्याने मृत्युपूर्व लिहून ठेवले होते़ ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गोडसेने आत्महत्या केली़ ही शाळा मुख्य रस्त्यावरच आहे़ तसेच गोडसे याचे काही नातेवाईकही देवणी परिसरात आहेत़ त्यामुळे खुनाच्या घटनेनंतर गोडसे हा लातूर जिल्ह्यातच वास्तव्याला असल्याची शक्यता बळावली आहे़ दरम्यान, गोडसे याने चिठ्ठीत नमूद केलेल्या दहा जणांच्या नावाच्या आधारे लातूर पोलिसांनी तपास सुरु केला होता़ त्यानुसार दोन दिवसांपूर्वी लातूरचे पथक बारड येथे आले होते़ त्यांनी यावेळी दहा जणांचे जबाब नोंदवून घेतले़ या जबाबाच्या आधारे यापैकी कुणाचा प्राध्यापक भिमेवार याच्या खून प्रकरणाची संबंध आहे किंवा नाही याची पडताळणी पोलिस करीत आहेत़ या प्रकरणात गोडसे याला सुपारी देणारा अद्यापही मोकळाच असून पोलिसांना तपासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ तर दुसरीकडे बारडमध्ये मात्र उलटसुलट चर्चेचे पेव फुटले आहे़ त्यामुळे या प्रकरणातील खरा आरोपी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ (प्रतिनिधी)