शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

खून प्रकरणात दहा जणांचे जबाब

By admin | Updated: January 15, 2016 23:38 IST

नांदेड : बारड येथील रहिवासी आणि सहयोग संकुलात प्राध्यापक असलेल्या कपिल भिमेवार खून प्रकरणाला सूत्रधार नंदू गोडसेच्या आत्महत्येनंतर वेगळीच कलाटणी मिळाली आहे़

नांदेड : बारड येथील रहिवासी आणि सहयोग संकुलात प्राध्यापक असलेल्या कपिल भिमेवार खून प्रकरणाला सूत्रधार नंदू गोडसेच्या आत्महत्येनंतर वेगळीच कलाटणी मिळाली आहे़ गोडसेने लिहिलेल्या मृत्युपूर्वी चिठ्ठीवरुन लातूर पोलिस पथकाने बारड येथील दहा जणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत़ यातील नावांचा खून प्रकरणाची संबंध आहे किंवा केवळ राजकीय वैमनस्यातून ती टाकण्यात आली याबाबतची सत्यता पोलिस पडताळून पाहत आहेत़२९ डिसेंबर रोजी प्रा़ कपिल भिमेवार याचे प्रेत असदवन शिवारात सापडले होते़ याप्रकरणात तीन आरोपी अटकेत असून मुख्य सूत्रधार असलेल्या नंदू गोडसे याने लातूर जिल्ह्यातील देवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्या केली आहे़ या आत्महत्येसाठी गोडसे याने नवीन दोर विकत घेतला होता़ तसेच त्याच्या पोटाला बांधलेल्या डायरीत त्याने मृत्युपूर्व लिहून ठेवले होते़ ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत गोडसेने आत्महत्या केली़ ही शाळा मुख्य रस्त्यावरच आहे़ तसेच गोडसे याचे काही नातेवाईकही देवणी परिसरात आहेत़ त्यामुळे खुनाच्या घटनेनंतर गोडसे हा लातूर जिल्ह्यातच वास्तव्याला असल्याची शक्यता बळावली आहे़ दरम्यान, गोडसे याने चिठ्ठीत नमूद केलेल्या दहा जणांच्या नावाच्या आधारे लातूर पोलिसांनी तपास सुरु केला होता़ त्यानुसार दोन दिवसांपूर्वी लातूरचे पथक बारड येथे आले होते़ त्यांनी यावेळी दहा जणांचे जबाब नोंदवून घेतले़ या जबाबाच्या आधारे यापैकी कुणाचा प्राध्यापक भिमेवार याच्या खून प्रकरणाची संबंध आहे किंवा नाही याची पडताळणी पोलिस करीत आहेत़ या प्रकरणात गोडसे याला सुपारी देणारा अद्यापही मोकळाच असून पोलिसांना तपासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे़ तर दुसरीकडे बारडमध्ये मात्र उलटसुलट चर्चेचे पेव फुटले आहे़ त्यामुळे या प्रकरणातील खरा आरोपी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ (प्रतिनिधी)