शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

दहा दिवसांत नऊ दुचाकी खाक

By admin | Updated: December 28, 2014 01:25 IST

वाळूज महानगर : बजाजनगरात दुचाकी जाळण्याचे सत्र नॉनस्टॉप सुरूच असून, आज मध्यरात्री पुन्हा तीन दुचाकी जाळल्यामुळे वाहनधारकांत खळबळ उडाली आहेत.

वाळूज महानगर : बजाजनगरात दुचाकी जाळण्याचे सत्र नॉनस्टॉप सुरूच असून, आज मध्यरात्री पुन्हा तीन दुचाकी जाळल्यामुळे वाहनधारकांत खळबळ उडाली आहेत. दहा दिवसांत नऊ दुचाकी जाळल्यामुळे पोलीस प्रशासनाविषयी असंतोष व्यक्त होत आहे. वाहने जाळणाऱ्या माथेफिरूटोळीचा छडा लावण्यात स्थानिक पोलीस प्रशासन सतत अपयशी ठरत असल्यामुळे वाहने जाळण्याचे प्रकार बिनबोभाटपणे सुरूआहे.बजाजनगर परिसरात तीन वर्षांपासून दुचाकी व चारचाकी वाहने जाळणाऱ्या माथेफिरू टोळीने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी बेमालूमपणे पेटवून दिल्या जात असल्यामुळे वाहनधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आज २७ डिसेंबरला वडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या छत्रपतीनगरातील संजय अंबादास वाघ यांची पल्सर दुचाकी क्र. (एम.एच.-२०, डी.एल.-२३११) व कैलास किसन पवार यांची पल्सर दुचाकी क्र. (एम.एच.-२०, डी.बी.-५८६०) या दोन दुचाकी अज्ञात माथेफिरूने पहाटे २.१५ वाजेच्या सुमारास पेटवून दिल्या. या दुचाकी जळत असताना स्फोटासारखा आवाज झाल्यामुळे शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पर्यंत या दुचाकी पूर्णपणे जळाल्या होत्या. या आगीची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी पेटविणाऱ्या माथेफिरूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथक छत्रपतीनगरात असताना अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरानंतर सीमेन्स सोसायटीतील ज्ञानेश्वर बाबाजी विघ्ने यांची दुचाकी क्र.(एम.एच.-२०, डी.एम.-४०८०) कुणीतरी अज्ञात इसमाने आग लावली होती. दुचाकी जळत असताना आवाज झाल्यामुळे शेजारी राहणारे विजय जाधव यांनी मोबाईलद्वारे सय्यद मुन्शी यांच्याशी संपर्क साधून काहीतरी जळण्याचा वास येत असल्याचे सांगितले. यामुळे सय्यद मुन्शी, आफरिन सय्यद घराबाहेर आले असता त्यांना दोन दुचाकी जळत असल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे कॉलनीतील नागरिक मारुती इंगळे, संजय नातवणे, राजू जाधव मदतीसाठी धावले. यावेळी सय्यद मुन्शी यांची दुचाकी क्र. (एम. एच.-२०, ए.एल.-६३) हिला वाचविण्यात यश आले असून, या दुचाकीचे सिट तसेच इंडिकेटर जळाले आहे.दरम्यान, या दुचाकीलगत असलेल्या ज्ञानेश्वर विघ्ने यांच्या नव्या दुचाकीचा पुरता कोळसा झाला आहे. याप्रकरणी संजय वाघ यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध तीन दुचाकी जाळल्याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास फौजदार जोंधळे करीत आहेत.या आगीच्या घटनेत राहुल रमेश पाटील यांची (एम.एच.-२०, सी.डब्ल्यू-३२३९), गणेश माणिकराव डोरके यांची (एम.एच.-२०, बी.एम.९१६७) व सुहास भास्कर पाटील यांची (एम.एच.-२०, सी.डी.-३२८५) या तीन बजाजनगरातील कामगारांच्या दुचाकी व पंढरपुरातील फत्तू शहा या फळ विक्रेत्याची दुचाकी जळाली होती.या दुचाकी जाळल्यानंतर माथेफिरूने याच ठिकाणी एक स्कूटी व एका दुचाकीवर पेट्रोल टाकून तिला आग लावण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, नागरिक मदतीसाठी धावल्याने या दुचाकींना आग न लावताच माथेफिरूपकडल्या जाण्याच्या भीतीने पसार झाले.