शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

तापमानाचा पारा पुन्हा ४२ अंशांवर

By admin | Updated: May 15, 2016 00:05 IST

औरंगाबाद : शहरात मागील आठवडाभरात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात कमालीची घट झाली होती. त्यामुळे असह्य उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना मोठा दिलासा मिळला

औरंगाबाद : शहरात मागील आठवडाभरात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात कमालीची घट झाली होती. त्यामुळे असह्य उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना मोठा दिलासा मिळला; परंतु पुन्हा एकदा सूर्याने आग ओकणे सुरू केले असून, शनिवारी तापमान ४२ अंशांवर गेले. दिवसभर प्रचंड उकाडा जाणवल्याने शहरवासीय चांगलेच घामाघूम झाले. तापमानातील वाढीने मार्च आणि एप्रिल महिन्यांत शहरवासीयांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागला. गेल्या आठवडाभरात शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यातच ९ मे रोजी जिल्ह्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. शहरातही विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला . त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. या दिवशी शहराचे तापमान ३७.९ अंश नोंदविल्या गेले. पावसामुळे तापमानात घट झाल्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून मुक्तता झाली होती. त्यामुळे कूलर, पंखे बंद ठेवण्यावर भर दिला जात होता. परंतु पुन्हा एकदा तापमानात वाढ होण्यास प्रारंभ झाला आहे.शहरातील तापमान १२ मे रोजी ४०.६ अंश नोंदविल्या गेले होते. अवघ्या दोन दिवसांतच तापमानाने उसळी घेतली आहे. शहरातील तापमानाने शनिवारी पुन्हा ४२ अंश सेल्शिअसचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे उन्हाच्या काहिलीचा त्रास शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. 2प्रचंड उकाड्याला नागरिकांना सामोेरे जावे लागत असून, सकाळपासूनच सूर्याच्या प्रकोपाची तीव्रता सायंकाळी उशिरापर्यंत जाणवत आहे. उन्हाच्या चटक्याने आबालवृद्ध हैराण होत आहेत. 3आगामी दिवसात तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.