शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

‘चाईल्ड पॉप्युलेशन’साठी शिक्षकांची वस्ती, तांड्यावर धावाधाव

By admin | Updated: December 15, 2014 00:49 IST

शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद शिक्षक गाव, वस्त्या, तांडे, वाड्या तुडवीत फिरत आहेत.

शांतीलाल गायकवाड, औरंगाबादआपल्या भागातील ‘चाईल्ड पॉप्युलेशन’ नेमके किती, हे वयोगटानुसार शोधून काढण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांवर टाकण्यात आली असून, त्यासाठी शिक्षक गाव, वस्त्या, तांडे, वाड्या तुडवीत फिरत आहेत. मिळणाऱ्या माहितीतून गाव, वस्त्या, तांडे व वाड्यानिहाय शाळा विकास आराखडा व शिक्षण पत्रिका तयार केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिकार (२००९) अधिनियमाच्या कलम १२ (३) व २२ नुसार त्या-त्या भागातील ‘विद्यार्थी संख्ये’नुसार वस्त्या, तांडे व वाड्यानुसार शिक्षणपत्रिका व शिक्षण विकास आराखडा तयार करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे वयोगटानिहाय ‘चाईल्ड पॉप्युलेशन’च्या शोधात शिक्षक बाहेर पडले आहेत. शिक्षकांना कुटुंब पत्रिका भरून घ्यावी लागते आहे. त्यात जातसंवर्ग, व्यवसाय, कुटुंबातील सदस्य संख्या (स्त्री-पुरुष), ० ते १८ वयोगटातील मुलांची संख्या, दुर्बल घटकांचा असल्यास स्वतंत्र तपशील भरला जातो. विशेष म्हणजे शिक्षणपत्रिकेत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र नमुन्यात माहिती भरावी लागते. लिंग, जन्मतारीख, शाळेत जातो किंवा नाही, कोणत्या शाळेत, शाळेतील सुविधांचा तपशील, अपंगत्व असल्यास नोंद करणे, विशेष गरजा असलेल्या मुलांची संख्या आदी सर्वच माहिती शिक्षण पत्रिकेत भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.उपरोक्त काम हे शैक्षणिक स्वरूपाचे व दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त असल्याने या किचकट विषयातही शिक्षक व शिक्षिका आनंदाने सहभागी झाल्याची प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षक संघाचे संजीव बोचरे, सुनील चिपाटे, मनोज चव्हाण, गणेश तांदळे, सुभाष भानुसे, जयाजी भोसले, अनिल सिरसाट यांनी नोंदविली आहे.