शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

वेतन अनुदानावरून शिक्षकांत आनंद कमी, नाराजी जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:04 IST

औरंगाबाद : तब्बल १० ते १५ वर्षे विनावेतन काम केलेल्या शिक्षकांना पहिल्यांदा २० टक्के वेतन मिळणार आहे, तर २० ...

औरंगाबाद : तब्बल १० ते १५ वर्षे विनावेतन काम केलेल्या शिक्षकांना पहिल्यांदा २० टक्के वेतन मिळणार आहे, तर २० टक्के वेतन घेत असलेल्या शिक्षकांना तब्बल पाच वर्षांनी २० टक्के वाढ मिळेल. या निर्णयामुळे वेतन अनुदान मिळालेल्या शिक्षकांत काहीसा आनंद असला तरी या निर्णयावर समाधान नाही.

शालेय शिक्षण आणि वित्त विभागाने सर्व सोपस्कार पूर्ण केले. त्यानंतर १५ फेब्रुवारीला अनुदानास पात्र म्हणून घोषित केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना नव्याने २० टक्के वेतन अनुदान दिले, तर २० टक्के वेतन अनुदान घेत असलेल्यांना २० टक्के वाढीव वेतन अनुदान १ नोव्हेंबरपासून देण्यासाठी १४० कोटींचा निधी वितरणाचा शासन आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला. त्याचा लाभ राज्यातील प्राथमिक ५ हजार ८१९, माध्यमिक १८ हजार ५७५ तर उच्च माध्यमिकच्या ८ हजार ८२० शिक्षक कर्मचाऱ्यांना होणार आहे.

आदेशात शासनाने केवळ चारच महिन्यांच्या निधीची तरतूद केली आहे. प्रचलित हा शब्द टाकला नाही. अघोषित शाळांचा प्रश्न तसाच लटकत ठेवला. त्यामुळे पुढच्या टप्प्यासाठी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागणार आहे. त्यासाठी आंदोलन करून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढू, असे मुप्टा संघटनेचे प्रा. सुनील मगरे यांनी सांगितले.

कोट..

मूळ मागण्या पूर्ण झाल्यावरच खरे समाधान

खूप संघर्षानंतर निधी वितरणाचा आदेश निघाला. मात्र, केवळ ४० टक्के शाळाच यात आहेत. अद्याप ६० टक्के घोषित, अघोषित शाळांचे प्रश्न प्रलंबित आहेत. अघोषित शाळा घोषित करणे आणि प्रचलित नियमानुसार वेतन मिळावे या दोन प्रमुख मागण्या पूर्ण झाल्यावरच त्यानंतर खरे समाधान असेल.

- मनोज पाटील, शिक्षक क्रांती

१४ वर्षांनतर मिळणार पहिल्यांदा पगार

१४ वर्षांपासून विनावेतन काम करत आहे. ११ वर्षांपूर्वी ॲप्रुव्हल निघाले. आता कुठे २० टक्के वेतन मिळणार आहे. यावर कसे समाधान व्हावे. आज मी १०० टक्केला पात्र असताना २० टक्के वेतनावर समाधान मानून पुढची वाढ कधी मिळेल आणि पूर्ण पगार कधी मिळेल याची वाट पाहावी लागणार.

-अश्विनी इंगेळे, शिक्षिका

एकही शिक्षक वेतनापासून वंचित राहणार नाही

आर्थिक तरतूद गेल्या वर्षीच्या अधिवेशनात झाली होती. कोरोनाच्या संकटात तो निधी मिळायला अडचण होती. ती अडचण दूर झाली. ३३ हजार ३०० लोकांचे वेतन सुरू होत आहे. त्यासाठी आदेश काढणे गरजचे होते. त्यासाठी मुंबईत ठाण मांडून आहे. राज्यात एकही शिक्षक वेतनापासून वंचित राहणार नाही.

-आ. विक्रम काळे, शिक्षक मतदारसंघ