शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

बदल्या रद्द होऊनही शिक्षक जागचे हलेनात !

By admin | Updated: July 30, 2014 00:49 IST

बीड : माध्यमिक विभागातील वस्तीशाळा शिक्षकांच्या बदल्या नियमबाह्य असल्याचा निर्वाळा देत त्या रद्द केल्या होत्या; पण आठ दिवस उलटले तरीही आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.

बीड : माध्यमिक विभागातील वस्तीशाळा शिक्षकांच्या बदल्या नियमबाह्य असल्याचा निर्वाळा देत त्या रद्द केल्या होत्या; पण आठ दिवस उलटले तरीही आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे बदली रद्दचा आदेश म्हणजे ‘बोलाचाच भात अन् बोलाचीच कडी’ ठरला आहे. जिल्हा परिषदेत वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी २१ जून २०१४ पर्यंत शासनाने मुदतवाढ दिली होती. तथापि, माध्यमिक शिक्षक संवर्गातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी तत्पूर्वीच समुपदेशन प्रक्रिया राबविली होती. बदलीसाठी पात्र शिक्षकांच्या यादीला अंतिम मान्यता देऊन आदेश निर्गमित करणे आवश्यक होते; पण तसे झाले नाही. याऊलट माध्यमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश परस्पर काढण्यात आले. सामान्य प्रशासन विभागातून बदल्यांचे आदेश सीईओंच्या स्वाक्षरीने जाणे गरजेचे असते; परंतु याला फाटा देण्यात आला. त्यामुळे २२ जुलै २०१४ रोजी सीईओ राजीव जवळेकर यांनी माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या सर्वच बदल्या रद्द केल्या. दरम्यान, आदेश निघून आठ दिवस उलटले तरीही बदली होऊन गेलेले माध्यमिक शिक्षक आहे तेथेच चिकटून बसले आहेत. बदली रद्दच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याने कमालीचे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे सीईओंचे आदेश म्हणजे ‘तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो...’ या म्हणीगत ठरले आहेत.अंमलबजावणी होणारचबदल्यांत अनियमितता झाल्याची माहिती समोर आल्याने सर्वच बदल्या रद्द कराव्या लागल्या. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे. आदेश न पाळल्यास संबधित मुख्याध्यापकांवर कारवाई करावी लागेल. शिक्षणाधिकाऱ्यांना बोलून यासंदर्भात नेमके काय झाले याची माहिती घ्यावी लागेल, असे सीईओ राजीव जवळेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पाणी, नरेगाकडे लक्षसीईओ राजीव जवळेकर म्हणाले, शिक्षण विभागातील बदल्या, पदोन्नत्यांपेक्षा पाणीपुरवठा, नरेगा ही कामे या काळात महत्त्वाची आहेत़ शिक्षण विभागाला शिस्त आणण्याबरोबरच ग्रामीण पाणीपुरवठ्याची प्रलंबित कामे व नरेगांतर्गत होणारी कामे पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न आहे़ (प्रतिनिधी)आदेशच अस्पष्ट !माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. मात्र, बदली रद्दचे आदेशच अस्पष्ट आहेत.कारण बदली आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नावांऐवजी मुख्याध्यापकांच्या नावे काढले.आदेशापुढे शाळेचे नावही नाही. आश्चर्याची बाब म्हणजे माध्यमिक विभागात किती शिक्षकांच्या बदल्या झाल्या? याची माहिती शिक्षण सामान्य प्रशासन, शिक्षण विभागाकडे नाही.त्यामुळे जि़ प़ ने किती मुख्याध्यापकांना आदेश धाडले आहेत याचीही माहिती नाही़मुख्याध्यापकांना सूचनाप्रभारी शिक्षणाधिकारी (प्रा.) एस. वाय. गायकवाड यांनी सांगितले की, माध्यमिक विभागातील शिक्षक बदल्या रद्द केल्या आहेत. जवळपास ३५ शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. बदल्या रद्दच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना बैठकीत दिलेल्या आहेत. याउपरही शिक्षकांना ‘रिलीव्ह’ केले नसेल तर आणखी एकदा सूचना देण्यात येतील.