शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

‘चहा’च्या चुस्कीसोबत रंगले चर्चेचे फड!

By admin | Updated: May 17, 2014 01:12 IST

औरंगाबाद : औरंगाबादसह देशभरातील निवडणूक निकालासंबंधीचे चित्र दुपारी स्पष्ट होताच शहरात निकालावर जोरदार खल सुरू झाला.

औरंगाबाद : औरंगाबादसह देशभरातील निवडणूक निकालासंबंधीचे चित्र दुपारी स्पष्ट होताच शहरात निकालावर जोरदार खल सुरू झाला. ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी स्थिती शहरभर होती. अनेक नागरिक ‘चहा’च्या चुस्कीसोबत मोदींची त्सुनामी, दिग्गज उमेदवारांच्या पदरी आलेला पराभव यावर चर्चा करताना दिसून आले. शहरात सकाळी ८ वाजेपासूनच औरंगाबादकर टीव्हीसमोर खिळून बसले होते. अनेक शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांनी कामाला दांडी मारली होती. देशातील सर्वांत मोठा ‘टॅलेंट शो’ पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. १० वाजेपासूनच नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशभरातील अनेक मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी घेतल्याचे दिसून आले. मतदारांचा कौल मोदींच्या झोळीत पूर्णत: असल्याचे पाहून अनेक कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली. सेना-भाजपा आणि महायुतीमधील मित्रपक्षांनी शहराच्या चौकाचौकांत ढोल-ताशे वाजवत आनंदोत्सव साजरा सुरू केला. दुपारी २ वाजता औरंगाबादेत विद्यमान खा. चंद्रकांत खैरे हे चौथ्यांदा बाजी मारणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले. कारण त्यांनी ७० हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी मिळविली होती. ही आघाडी आता कोणीही तोडू शकणार नाही, असा विश्वास अनेकांना होता. सायंकाळी ५ वाजेनंतर शहराच्या विविध भागांत, चौकाचौकांत चहाच्या टपरीवर गर्दी दिसून येऊ लागली. जिकडेतिकडे एकच चर्चा होती. मोदींनी काय भयानक जादू केली... कोणी मोदींच्या लाटेला त्सुनामी म्हटले, कोणी बेस्ट मार्केटिंग, तर कोणी बेस्ट प्लानिंगची उपमा दिली. यंदाच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी उमेदवारांकडे अजिबात पाहिले नाही, फक्त मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकतर्फी मतदान केल्याचे अनेकांनी नमूद केले. स्पष्ट बहुमत मिळण्याची ही पहिलीच वेळ ४निराला बाजार, औरंगपुरा, गुलमंडी, पैठणगेट, सिटीचौक, शहागंज, बुढीलेन आदी भागांत चहाच्या टपरीवर गप्पांचे फड रंगले होते. ज्येष्ठ नागरिकांच्या मते इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशभरात जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आज सत्ताधार्‍यांची झाली आहे. मागील ३० वर्षांमध्ये एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांनी नमूद केले. एकंदरीत ‘आम’आदमीला नवीन सरकारकडून बर्‍याच अपेक्षा आहेत. निवडणूक प्रचारात ‘अच्छे दिन आने वाले है...’चा नारा देण्यात आला होता. तो कितपत खरा ठरतो हेसुद्धा मतदार चहाच्या चुस्कीसोबत पाहतील.