शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

गौण खनिजाच्या कारवाईचे उद्दिष्ट २८ टक्क्यांवरच

By admin | Updated: January 13, 2015 00:13 IST

बाळासाहेब जाधव , लातूर लातूर जिल्ह्यातील वाळू, खडी, मुरुम, माती याची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार

बाळासाहेब जाधव , लातूरलातूर जिल्ह्यातील वाळू, खडी, मुरुम, माती याची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्या-त्या तालुक्यांतील तहसीलदारांनी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु, या कारवाईत पोलिस प्रशासनाचे म्हणावे तसे सहकार्य मिळत नसल्याने गौण खनिजाच्या कारवाईचे उद्दिष्ट नऊ महिन्यांत २८ टक्क्यांपर्यंतच पोहोचले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर निघत आहे.लातूर जिल्ह्यात वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची परवानगी घेण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजीच संपली आहे. त्यानंतर एकाही वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी नवीन परवाना काढलेला नाही. तर माती, दगड, मुरुम वाहतूक करणाऱ्या ९१ वाहनधारकांपैकी ३४ जणांनी परवाने काढले आहेत. उर्वरित वाहनधारक मात्र अवैध पद्धतीने वाळू, दगड, माती, मुरुम याचा उपसा करीत असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. २०१४-१५ या चालू वर्षात लातूर तालुक्याला ३२५ प्रकरणांचे उद्दिष्ट दिले होते. नऊ महिन्यांत लातूर तहसीलदारांनी ५० प्रकरणे मार्गी लावली आहेत. या माध्यमातून केलेल्या कारवाईचे प्रमाण १५ टक्क्यांवरच आहे. औसा तालुक्याला दीडशे प्रकरणांचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी ९० कारवाईची प्रकरणे मार्गी लागली आहेत. त्यामुळे या तालुक्याचे प्रमाण ६० टक्क्यांवर गेले आहे. रेणापूर तालुक्यासाठी शंभर प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २४ वाहनधारकांवरच कारवाई करून थांबल्याने हे उद्दिष्ट २४ टक्क्यांवर गेले आहे. उदगीर तालुक्यासाठी २८५ प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ९४ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून, या तालुक्याचे प्रमाण ३२ टक्क्यांवर गेले आहे. जळकोट तालुक्यासाठी ९० प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी २० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली असून, या तालुक्यांचे प्रमाण २५ टक्क्यांवर गेले आहे. अहमदपूर तालुक्यासाठी २४० प्रकरणांचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी ९१ वाहनधारकांवर कारवाई केल्याने या तालुक्याचे प्रमाण ३८ टक्क्यांवर पोहोचले आहे. चाकूर तालुक्यासाठी २३० प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १३२ अवैध वाहनधारकांवर कारवाई केल्याने हे प्रमाण ६० टक्क्यांवर आले आहे. निलंगा ३५५ प्रकरणांपैकी १०९ वाहनधारकांवर कारवाई केल्याने या तालुक्याचे उद्दिष्ट ३३ टक्क्यांवर आले आहे. देवणी तालुक्यासाठी १२५ प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या माध्यमातून ३९ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, या तालुक्याचे उद्दिष्ट ४८ टक्क्यांवर गेले आहे. शिरूर अनंतपाळ १२० प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी १० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे तालुक्याचे उद्दिष्ट १२ टक्क्यांवर गेले आहे. अशा एकूण लातूर जिल्ह्यासाठी २०२० प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ६५९ वाळू, रेती, दगड, मुरुम याची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून २८ टक्क्यांवरच उद्दिष्ट पोहोचले असून, या माध्यमातून ५४ लाख ५८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.लातूर जिल्ह्यात चालू महिन्यातही गौण खनिज, अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम रेणापूर, लातूर आणि उदगीर तालुक्यांत सुरू केली आहे. परंतु, या मोहिमेला गती मिळण्यासाठी पोलिस प्रशासनाचे म्हणावे तसे सहकार्य मिळत नाही. गेल्यावर्षी रेणापूर तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यांना मारण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, पोलिस प्रशासनाने कडक भूमिका न घेतल्याने या मोहिमेला खिळ बसली असल्याची खंत जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. गौण खनिजाचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने २०१४-१५ साठी उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये जिल्हाभरातील एकूण तालुक्यांपैकी कोणत्याही तालुक्याने उद्दिष्टपूर्ती केली नाही. तरीही झालेल्या उद्दिष्टामध्ये औसा तालुका आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.