शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
4
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
5
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
6
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
7
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
8
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
9
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
10
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
11
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
12
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
13
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
14
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
15
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
16
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
17
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
18
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
19
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
20
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ

तंटामुक्त गाव समित्या फक्त कागदोपत्रीच

By admin | Updated: June 10, 2014 00:59 IST

राजू वैष्णव , सिल्लोड छोट्या-छोट्या कारणावरून उद्भवणाऱ्या वादाच्या तक्रारींवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येत असल्याने तंटामुक्त गाव समित्या कागदोपत्रीच आहेत.

राजू वैष्णव , सिल्लोडछोट्या-छोट्या कारणावरून उद्भवणाऱ्या वादाच्या तक्रारींवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येत असल्याने तंटामुक्त गाव समित्या कागदोपत्रीच आहेत. शासनाच्या तंटामुक्त गाव अभियानाला पोलिसांकडूनच छेद दिला जात असल्याने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या कुचकामी ठरत आहेत. गावातील सर्व समाजाने गुण्यागोविंदाने राहावे, आपापसातील तंटे गावपातळीवर मिटवून गावात शांतता नांदावी, यासाठी राज्य शासनाने तंटामुक्त गाव समिती अभियान सुरू केले. या अभियानांतर्गत दरवर्षी दि.१५ आॅगस्टला गावपातळीवर तंटामुक्त गाव समिती गठित केली जाते. या समितीमध्ये सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, माजी सैनिक, शिक्षक, पदवीधर तरुण, वकील, पत्रकार आदींची निवड केली जाते. या अभियानांतर्गत गावातील तंटे गावात मिटवून व सर्व धार्मिक उत्सव शांततेत पार पाडणाऱ्या गावांना लोकसंख्येनुसार बक्षीस दिले जाते. सुरुवातीला या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेली प्रकरणे सामंजस्याने आपापसात समेट घडवून निकाली काढण्यात आली. अनेक गावांना तंटामुक्त गावाचे बक्षीस मिळाले. यातून गावकऱ्यांनी गावात विकास कामे करून घेतली; परंतु गेल्या एक-दोन वर्षांपासून तंटामुक्त गाव समित्या कागदोपत्रीच आहेत. छोट्या-छोट्या परस्परविरोधी तक्रारींवरून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात येत आहे. यामुळे पोलिसांना दोन्ही गटांतील फिर्यादी आरोपींकडून चिरीमिरी मिळते. चिरीमिरी मिळविण्यासाठी पोलिसांकडून तक्रारीची शहानिशा न करता गुन्हा नोंदविण्यात येत आहे. यामुळे छोट्या-छोट्या कारणावरील वादाची मनात सल राहून पुढे या वादांना खतपाणी मिळते. गावातील तंटे गावात मिटविण्यासाठी पोलिसांनीही सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे, तरच शासनाने सुरू केलेले महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान यशस्वी होईल. समिती अध्यक्षांना तक्रारींची माहिती देणे गरजेचेछोट्या-छोट्या कारणावरून उद्भवणाऱ्या वादांच्या तक्रारींवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येत आहे. छोट्या-छोट्या कारणांवरून ठाण्यात येणाऱ्या तक्रारींची माहिती सदरील गावातील तंटामुक्त अध्यक्षांना दिली पाहिजे, जेणेकरून सदर तंटा गावात सामंजस्याने मिटवता येईल. यामुळे दोन्हीकडील तक्रारदारांमध्ये समेट घडवून आपापसातील क्षुल्लक कारणावरील गैरसमज दूर होतील. गावपातळीवर तंटा न मिटल्यास त्यानंतर ठाण्यात गुन्हा नोंदवावा. यामुळे छोट्या-छोट्या तक्रारी पोलीस ठाण्यात येणार नाहीत; परंतु पोलिसांना यामध्ये स्वारस्य नाही.