शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

कोट्यवधीच्या योजना राबविलेल्या गावांमध्येच टँकरद्वारे पाणी

By admin | Updated: May 18, 2014 00:46 IST

बीड: जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या बहुतांश पाणीपुरवठा योजना केवळ कागदावरच आहेत़

बीड: जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या बहुतांश पाणीपुरवठा योजना केवळ कागदावरच आहेत़ यामुळे यापुढे टंचाई भागाची संबंधित तहसीलदार व बिडीओ यांनी पहाणी करून जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल सादर करताच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़ यामुळे पाणीपुरवठा तात्काळ होण्यास मदत होणार आहे़ जिल्ह्यात आज स्थितीत ९३ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे़ यामध्ये ७४ टँकर खाजगी असून १९ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ सध्या उपलब्ध असलेली पाणीपुरवठा यंत्रणा बीड जिल्हयात अपुरी पडत असून आष्टी, शिरूर कासार, धारूर या तालुक्यातून टँकरची मागणी होत आहे़ जिल्ह्यातील नागरीकांची टँकर मागणी दिवसेंदिवस वाढत आहे़ विशेष म्हणजे जिल्हा परिषेतील पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यात कोट्यावधी रूपये खर्च करून पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबविलेल्या आहेत, परंतु अनेक योजना एकतर अर्धवट अवस्थेत आहेत़ नाहीतर पाणी पुरवठ्याच्या योजना केवळ कागदावरच आहेत़ यामुळे संबधीत गावांना योजना देऊन देखील पिण्यासाठी पाणी मिळत नाही़ ही वास्तविकता बीड जिल्ह्यात पहावयास मिळते़ यापूर्वी विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी देखील बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या पाणीपुरवठा योजनांच्या संदर्भात चिंता व्यक्त करून ग्रामीण भागातील नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावे़ अशा सुचना देखील संबधीत विभागाला दिल्या होत्या़ पाटोदा, शिरूर कासार, आष्टी व धारूर या तालुक्यांमध्या पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे़ यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचा अहवाल प्राप्त झाल्या शिवाय संबधीत गावाला टँकर देता येत नव्हते़ परंतु पाणीपुरवठा विभागाच्या बहुंताश योजनाचा गाशा गुंडाळलेला आहे तर ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत़ यामुळे येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैलची पायपिठ करावी लागत आहे़ यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने संबधीत तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संबंधित गावांची पहाणी करून खरोखरच पाणी टंचाई असेल तर तात्काळ टँकरला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले़ जिल्हाधिकारी करणार प्रत्यक्ष पहाणी जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर व अंबाजोगाई तालुक्यातील टंचाईगस्त गावांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे स्वत: भेट देणार आहेत़ याबरोबरच पाणीटंचाई असलेल्या गावांना तात्काळ पाणीपुरवठा करण्यासंबधी सुचना दिलेल्या असल्याचे राम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़