शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

कोट्यवधीच्या योजना राबविलेल्या गावांमध्येच टँकरद्वारे पाणी

By admin | Updated: May 18, 2014 00:46 IST

बीड: जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या बहुतांश पाणीपुरवठा योजना केवळ कागदावरच आहेत़

बीड: जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या बहुतांश पाणीपुरवठा योजना केवळ कागदावरच आहेत़ यामुळे यापुढे टंचाई भागाची संबंधित तहसीलदार व बिडीओ यांनी पहाणी करून जिल्हाधिकार्‍यांकडे अहवाल सादर करताच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़ यामुळे पाणीपुरवठा तात्काळ होण्यास मदत होणार आहे़ जिल्ह्यात आज स्थितीत ९३ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे़ यामध्ये ७४ टँकर खाजगी असून १९ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे़ सध्या उपलब्ध असलेली पाणीपुरवठा यंत्रणा बीड जिल्हयात अपुरी पडत असून आष्टी, शिरूर कासार, धारूर या तालुक्यातून टँकरची मागणी होत आहे़ जिल्ह्यातील नागरीकांची टँकर मागणी दिवसेंदिवस वाढत आहे़ विशेष म्हणजे जिल्हा परिषेतील पाणी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यात कोट्यावधी रूपये खर्च करून पाणी पुरवठ्याच्या विविध योजना राबविलेल्या आहेत, परंतु अनेक योजना एकतर अर्धवट अवस्थेत आहेत़ नाहीतर पाणी पुरवठ्याच्या योजना केवळ कागदावरच आहेत़ यामुळे संबधीत गावांना योजना देऊन देखील पिण्यासाठी पाणी मिळत नाही़ ही वास्तविकता बीड जिल्ह्यात पहावयास मिळते़ यापूर्वी विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी देखील बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या पाणीपुरवठा योजनांच्या संदर्भात चिंता व्यक्त करून ग्रामीण भागातील नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावे़ अशा सुचना देखील संबधीत विभागाला दिल्या होत्या़ पाटोदा, शिरूर कासार, आष्टी व धारूर या तालुक्यांमध्या पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे़ यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचा अहवाल प्राप्त झाल्या शिवाय संबधीत गावाला टँकर देता येत नव्हते़ परंतु पाणीपुरवठा विभागाच्या बहुंताश योजनाचा गाशा गुंडाळलेला आहे तर ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत़ यामुळे येथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैलची पायपिठ करावी लागत आहे़ यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने संबधीत तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संबंधित गावांची पहाणी करून खरोखरच पाणी टंचाई असेल तर तात्काळ टँकरला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले़ जिल्हाधिकारी करणार प्रत्यक्ष पहाणी जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर व अंबाजोगाई तालुक्यातील टंचाईगस्त गावांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे स्वत: भेट देणार आहेत़ याबरोबरच पाणीटंचाई असलेल्या गावांना तात्काळ पाणीपुरवठा करण्यासंबधी सुचना दिलेल्या असल्याचे राम यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़