शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

टंचाईग्रस्त गावातीलच टँकर बंद

By admin | Updated: July 31, 2016 01:15 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील बारा गावांमध्ये अद्याप पाणी पातळी वाढली नाही, असा अहवाल दिलेला आहे. असे असताना देखील तहसील कार्यालयांनी पाण्याचे टँकर बंद केले आहेत.

व्यंकटेश वैष्णव , बीडभूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील बारा गावांमध्ये अद्याप पाणी पातळी वाढली नाही, असा अहवाल दिलेला आहे. असे असताना देखील तहसील कार्यालयांनी पाण्याचे टँकर बंद केले आहेत. पाऊस पडला हाच निकष लावून भूजलच्या अहवालाकडे डोळेझाक केली आहे. सध्या ४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, जी गावे टंचाईग्रस्त आहेत त्याच गावातील टँकर बंद केल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.पाऊस पडला की, दुसऱ्याच दिवशी विहीर व बोअरला पाणी आले, असे गृहित धरून तज्ञांच्या अहवालाकडे डोळे झाक करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून धारूर, आष्टी व केज तालुका वगळता इतर तालुक्यातील टँकर बंद केले आहेत. बीड भूजल विभागाच्या म्हणण्यानुसार बीड तालुक्यातील ९ व जिल्ह्यातील बारा गावांमध्ये अद्यापही बोअर व विहिरींना पाणी आलेले नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधीत तहसिल कार्यालयाकडे अहवाल सादर केलेला आहे. असे असताना देखील तहसिलदारांकडून कुठलीच दखल घेतली जात नाही.भूजल विभागाकडून बीड जिल्ह्यातील पाणीपातळी बाबत पहाणी करून अहवाल सादर केला आहे. जिल्ह्यातील एकूण बारा गावांमध्ये अद्याप पाणीपातळी वाढलेली नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले. बीड तालुक्यातील जेबापिंप्री, चौसाळा, देवी बाभळगाव, चांदेगाव, पालसिंगण, हिंगणी बु. आदी गावांचा समावेश आहे.पाणीपातळी वाढली नसल्याचा अहवाल असताना देखील जिल्हा प्रशासनाने पाण्याचे टँकर बंद केले. याविरोधात बीड तालुक्यातील चौसाळा येथे धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोकोचा इशारा सात ते आठ गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.मागील पाच- दहा वर्षातील सर्वाधिक तीव्र दुष्काळ यावेळी अनुभवायला मिळाला. साडेनऊशेवर टँकरची आकडेवारी गेली होती. याचा फायदा काही ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी घेत बोगस टँकर फेऱ्या दाखवल्याचे शनिवारी समोर आले आहे.४बीड तालुक्यातील जप्तीपारगाव येथे मागील तीन-चार महिन्यांपासून टँकर सुरू असल्याचे अहवालात समोर आले आहे. याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.सद्यस्थितीत चांगला पाऊस होत आहे, हे आकडेवारीवरून समोर येत आहे. मात्र ,बीड तालुक्यातील काही जमीनीवरील खडक कडक स्वरूपाचा आहे. त्यामुळे पाणी पातळी वाढण्यासाठी वेळ लागत आहे.४भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन पाणी पातळी वाढते हे भूजल विभागाचे म्हणणे आहे. मात्र ,प्रशासन याकडे दुर्लक्ष करत थेट टँकर बंद करण्याचाच निर्णय घेत असल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे.४जिल्हा प्रशासनाने भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाहणी अहवालाकडेच दुर्लक्ष केल्यामुळे अनेक टंचाई असलेली गावे भर पावसाळ्यात तहानलेली आहेत. १४४ प्रकल्पांपैकी केवळ दोन लघु प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी आलेले आहे. उर्वरित प्रकल्प कोरडेठाक आहेत.