शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त गावातीलच टँकर बंद

By admin | Updated: July 31, 2016 01:15 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील बारा गावांमध्ये अद्याप पाणी पातळी वाढली नाही, असा अहवाल दिलेला आहे. असे असताना देखील तहसील कार्यालयांनी पाण्याचे टँकर बंद केले आहेत.

व्यंकटेश वैष्णव , बीडभूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील बारा गावांमध्ये अद्याप पाणी पातळी वाढली नाही, असा अहवाल दिलेला आहे. असे असताना देखील तहसील कार्यालयांनी पाण्याचे टँकर बंद केले आहेत. पाऊस पडला हाच निकष लावून भूजलच्या अहवालाकडे डोळेझाक केली आहे. सध्या ४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, जी गावे टंचाईग्रस्त आहेत त्याच गावातील टँकर बंद केल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.पाऊस पडला की, दुसऱ्याच दिवशी विहीर व बोअरला पाणी आले, असे गृहित धरून तज्ञांच्या अहवालाकडे डोळे झाक करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून धारूर, आष्टी व केज तालुका वगळता इतर तालुक्यातील टँकर बंद केले आहेत. बीड भूजल विभागाच्या म्हणण्यानुसार बीड तालुक्यातील ९ व जिल्ह्यातील बारा गावांमध्ये अद्यापही बोअर व विहिरींना पाणी आलेले नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधीत तहसिल कार्यालयाकडे अहवाल सादर केलेला आहे. असे असताना देखील तहसिलदारांकडून कुठलीच दखल घेतली जात नाही.भूजल विभागाकडून बीड जिल्ह्यातील पाणीपातळी बाबत पहाणी करून अहवाल सादर केला आहे. जिल्ह्यातील एकूण बारा गावांमध्ये अद्याप पाणीपातळी वाढलेली नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले. बीड तालुक्यातील जेबापिंप्री, चौसाळा, देवी बाभळगाव, चांदेगाव, पालसिंगण, हिंगणी बु. आदी गावांचा समावेश आहे.पाणीपातळी वाढली नसल्याचा अहवाल असताना देखील जिल्हा प्रशासनाने पाण्याचे टँकर बंद केले. याविरोधात बीड तालुक्यातील चौसाळा येथे धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोकोचा इशारा सात ते आठ गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.मागील पाच- दहा वर्षातील सर्वाधिक तीव्र दुष्काळ यावेळी अनुभवायला मिळाला. साडेनऊशेवर टँकरची आकडेवारी गेली होती. याचा फायदा काही ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी घेत बोगस टँकर फेऱ्या दाखवल्याचे शनिवारी समोर आले आहे.४बीड तालुक्यातील जप्तीपारगाव येथे मागील तीन-चार महिन्यांपासून टँकर सुरू असल्याचे अहवालात समोर आले आहे. याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.सद्यस्थितीत चांगला पाऊस होत आहे, हे आकडेवारीवरून समोर येत आहे. मात्र ,बीड तालुक्यातील काही जमीनीवरील खडक कडक स्वरूपाचा आहे. त्यामुळे पाणी पातळी वाढण्यासाठी वेळ लागत आहे.४भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन पाणी पातळी वाढते हे भूजल विभागाचे म्हणणे आहे. मात्र ,प्रशासन याकडे दुर्लक्ष करत थेट टँकर बंद करण्याचाच निर्णय घेत असल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे.४जिल्हा प्रशासनाने भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाहणी अहवालाकडेच दुर्लक्ष केल्यामुळे अनेक टंचाई असलेली गावे भर पावसाळ्यात तहानलेली आहेत. १४४ प्रकल्पांपैकी केवळ दोन लघु प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी आलेले आहे. उर्वरित प्रकल्प कोरडेठाक आहेत.