शहरं
Join us  
Trending Stories
1
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
2
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
3
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
4
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
5
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
6
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
7
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
8
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
9
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
10
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
11
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
12
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
13
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
14
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
15
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
16
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
17
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
18
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
19
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
20
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...

टंचाईग्रस्त गावातीलच टँकर बंद

By admin | Updated: July 31, 2016 01:15 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील बारा गावांमध्ये अद्याप पाणी पातळी वाढली नाही, असा अहवाल दिलेला आहे. असे असताना देखील तहसील कार्यालयांनी पाण्याचे टँकर बंद केले आहेत.

व्यंकटेश वैष्णव , बीडभूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील बारा गावांमध्ये अद्याप पाणी पातळी वाढली नाही, असा अहवाल दिलेला आहे. असे असताना देखील तहसील कार्यालयांनी पाण्याचे टँकर बंद केले आहेत. पाऊस पडला हाच निकष लावून भूजलच्या अहवालाकडे डोळेझाक केली आहे. सध्या ४९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, जी गावे टंचाईग्रस्त आहेत त्याच गावातील टँकर बंद केल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.पाऊस पडला की, दुसऱ्याच दिवशी विहीर व बोअरला पाणी आले, असे गृहित धरून तज्ञांच्या अहवालाकडे डोळे झाक करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून धारूर, आष्टी व केज तालुका वगळता इतर तालुक्यातील टँकर बंद केले आहेत. बीड भूजल विभागाच्या म्हणण्यानुसार बीड तालुक्यातील ९ व जिल्ह्यातील बारा गावांमध्ये अद्यापही बोअर व विहिरींना पाणी आलेले नाही. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधीत तहसिल कार्यालयाकडे अहवाल सादर केलेला आहे. असे असताना देखील तहसिलदारांकडून कुठलीच दखल घेतली जात नाही.भूजल विभागाकडून बीड जिल्ह्यातील पाणीपातळी बाबत पहाणी करून अहवाल सादर केला आहे. जिल्ह्यातील एकूण बारा गावांमध्ये अद्याप पाणीपातळी वाढलेली नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना नाव न छापण्याच्या अटीवर सांगण्यात आले. बीड तालुक्यातील जेबापिंप्री, चौसाळा, देवी बाभळगाव, चांदेगाव, पालसिंगण, हिंगणी बु. आदी गावांचा समावेश आहे.पाणीपातळी वाढली नसल्याचा अहवाल असताना देखील जिल्हा प्रशासनाने पाण्याचे टँकर बंद केले. याविरोधात बीड तालुक्यातील चौसाळा येथे धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोकोचा इशारा सात ते आठ गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.मागील पाच- दहा वर्षातील सर्वाधिक तीव्र दुष्काळ यावेळी अनुभवायला मिळाला. साडेनऊशेवर टँकरची आकडेवारी गेली होती. याचा फायदा काही ठेकेदार व कर्मचाऱ्यांनी घेत बोगस टँकर फेऱ्या दाखवल्याचे शनिवारी समोर आले आहे.४बीड तालुक्यातील जप्तीपारगाव येथे मागील तीन-चार महिन्यांपासून टँकर सुरू असल्याचे अहवालात समोर आले आहे. याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.सद्यस्थितीत चांगला पाऊस होत आहे, हे आकडेवारीवरून समोर येत आहे. मात्र ,बीड तालुक्यातील काही जमीनीवरील खडक कडक स्वरूपाचा आहे. त्यामुळे पाणी पातळी वाढण्यासाठी वेळ लागत आहे.४भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन पाणी पातळी वाढते हे भूजल विभागाचे म्हणणे आहे. मात्र ,प्रशासन याकडे दुर्लक्ष करत थेट टँकर बंद करण्याचाच निर्णय घेत असल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे.४जिल्हा प्रशासनाने भूजल सर्वेक्षण विभागाच्या पाहणी अहवालाकडेच दुर्लक्ष केल्यामुळे अनेक टंचाई असलेली गावे भर पावसाळ्यात तहानलेली आहेत. १४४ प्रकल्पांपैकी केवळ दोन लघु प्रकल्पांमध्ये जेमतेम पाणी आलेले आहे. उर्वरित प्रकल्प कोरडेठाक आहेत.