शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

नवे अप्रशिक्षित कर्मचारी घेण्यापेक्षा आम्हाला सेवेत घ्या

By admin | Updated: November 19, 2014 01:00 IST

औरंगाबाद : जीटीएल कंपनी नफ्यात होती. महिन्याला वीज बिलाच्या माध्यमातून ११० कोटी रुपये मिळत होते. महावितरण आणि जीटीएलच्या अर्थकारणाच्या वादात

औरंगाबाद : जीटीएल कंपनी नफ्यात होती. महिन्याला वीज बिलाच्या माध्यमातून ११० कोटी रुपये मिळत होते. महावितरण आणि जीटीएलच्या अर्थकारणाच्या वादात १,०३२ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे. महावितरण कंत्राटदाराच्या माध्यमातून काम करून घेणार आहे. त्यांना कंत्राट देण्यापेक्षा आम्हाला सेवेत घ्यावे, अशी मागणी जीटीएल कर्मचारी कृती संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, कंपनीने आम्हाला नोटीस दिली नाही. कंपनीत रुजू होताना १५ वर्षे नोकरी राहील, असे सांगितले होते. कंपनी महिन्याला ११० कोटी रुपये वीज बिलापोटी वसूल करीत होती. महावितरणकडे आठ ते नऊ महिने कंपनीने पैसे भरले नाहीत. त्यावेळी महावितरणचे अधिकारी काय करीत होते, असा प्रश्न समितीने उपस्थित केला. आमच्याकडे पात्रता आणि कामाचा अनुभव आहे. महावितरणने खाजगी कंत्राटदाराकडून अप्रशिक्षित कर्मचारी घेण्यापेक्षा आम्हाला सेवेत घ्यावे. आम्हाला शहराची पूर्ण माहिती आहे. त्याचा फायदा ग्राहकांना सेवा देताना होईल, असे समितीने सांगितले. महावितरणने सेवेत न घेतल्यास लवकरच कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला. यावेळी विजय पुरी, गजानन ढासलेकर, सतीश करपे, अरुण घागरे, प्रशांत सिरसाठ आदी कर्मचारी उपस्थित होते.वाळूज एमआयडीसी परिसरातून एक महिन्याच्या वीज बिलापोटी ५५ ते ६० कोटी रुपये आम्ही वसूल करीत होतो. त्यामुळे कंपनी तोट्यात आहे, असे म्हणणे चुकीचे आहे, असा दावा कर्मचाऱ्यांनी केला. मुंबईतून धमकीचे फोन४कंपनीकडे दोन दिवसांत राजीनामा लिहून द्या. जे काही मिळतील ते पैसे घ्या; अन्यथा काहीच मिळणार नाही, असे मुंबईतून फोन येत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.कंपनीने ३० ते ४० कर्मचाऱ्यांना चेक दिले आहेत; पण ते कशाचे पैसे आहेत, हे सांगितले जात नाही. कंपनीचे अधिकारी चेक देताना राजीनामा आणि इतर काही पत्रांवर स्वाक्षऱ्या घेत आहेत. चेक दिले; पण ते होल्डवर ठेवले आहेत, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.