शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

साथरोगांची लक्षणे; रुग्णांत झाली वाढ

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

औरंगाबाद - शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. ऋतूनुसार पावसाळा लागला आहे; मात्र पावसाने दडी मारलेली असली

औरंगाबाद - शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. ऋतूनुसार पावसाळा लागला आहे; मात्र पावसाने दडी मारलेली असली तरी कूलर, डबकी व साठवलेल्या स्वच्छ पाण्यातील डासांची पैदास वाढल्यामुळे तापाचे रुग्ण दवाखान्यांतून दिसून येत आहेत. शहानूरवाडी परिसर, रेल्वेगेटजवळील ओमप्रकाश अंबादास मोरे या दोनवर्षीय मुलाला एका खाजगी रुग्णालयात काल ११ रोजी ताप आल्यामुळे दाखल केले आहे. सदरील रुग्णालयाने ओमप्रकाशला डेंग्यू नसल्याचा अहवाल पालिकेला दिला आहे. त्यामुळे त्याला डेंग्यूचे लक्षण नसल्याचा दावा मनपा आरोग्य विभागाने केला आहे. मुकुंदवाडी, अंबिकानगर, राजीव गांधीनगर, जयभवानीनगर, एन-५, साईनगर, न्यू हनुमाननगर, कटकटगेट, फाजलपूर, हर्षनगर, गांधीनगर, जाफरगेट, खोकडपुरा, गरमपाणी, नौबत दरवाजा या भागात नाल्यांमुळे डासांचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मनपाने नालेसफाई तातडीने करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. डासांमुळे होणारे आजारडासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकुन गुनिया हे आजार होतात. अ‍ॅनाप्लेक्स डासामुळे हिवताप येतो. इजिप्टाय हा डास चावल्यास डेंग्यू व चिकुन गुनिया होतो. फ्युलेक्स हा डास चावल्यास हत्तीरोग होतो. पुढच्या आठवड्यात जनजागृतीसाठी मनपा प्रदर्शन भरवून डास, गप्पी माशांचे महत्त्व नागरिकांना पटवून सांगणार आहे. तसेच पावसाळ्यात खबरदारी म्हणून उपाययोजनांची माहितीही देणार आहे, असे मलेरिया विभाग अधिकारी शे. युनूस यांनी सांगितले. नागरिकांनी काळजी घ्यावी...आठवड्यातून एकदा भांडी स्वच्छ धुऊन कोरडी करून गाळून पाणी भरावे. स्वच्छ पाणी झाकून ठेवावे. डासविरोधी साधनांचा वापर करावा. घर स्वच्छ ठेवावे. परिसरात वाढलेले गवत, झुडपे कापून टाकावीत, असे आवाहन मनपाने केले आहे. आजाराची लक्षणेतीव्र ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, उलटी, सांधे व अंगदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, क्वचित पुरळ येणे ही डेंग्यूची, तर थंडी वाजून येणे, सतत किंवा दिवसाआड ताप येणे, घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे, उलट्या होणे ही हिवतापाची लक्षणे आहेत.