शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

सीताफळाची गोडी महाग !

By admin | Updated: December 14, 2015 23:57 IST

राजेश खराडे , बीड पौष्टिकतेच्या सर्व गुण संपन्नतेमुळे जिल्ह्यातील सीताफळाची ओळख संपूर्ण राज्यात झाली आहे. कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्याचे भौगोलिक चिन्हांकन म्हणून सीताफळाला

राजेश खराडे , बीडपौष्टिकतेच्या सर्व गुण संपन्नतेमुळे जिल्ह्यातील सीताफळाची ओळख संपूर्ण राज्यात झाली आहे. कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्याचे भौगोलिक चिन्हांकन म्हणून सीताफळाला प्राधान्यक्रम देत तसा प्रस्तावही शासनदरबारी धाडला. मात्र, दुसरीकडे अल्प पर्जन्यमानामुळे सीताफळ उत्पादन गोत्यात आले आहे. यंदा उत्पादनात सुमारे ७५ टक्के घट झाल्याने सीताफळाची गोडी महाग होण्याच्या मार्गावर आहे. शिवाय शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.जिल्ह्यात ५५० हेक्टरवर सीताफळाची लागवड आहे. डोंगराळ भाग अधिक असलेल्या धारूर, केज परिसरात सिताफळांची लागवड अधिक प्रमाणात झाली आहे . सिताफळाला आवश्यक असलेला ५५० ते ६५० मिमी पाऊसाची सरासरी जिल्ह्यात आहे. शिवाय कोरड्या व आर्द्रतायुक्त वातावरणामुळे सिताफळाच्या पौष्टिकतेमध्ये भर पडते. त्यामुळे त्याची चव चाखण्यासाठी नगर, पुणे येथील व्यापारी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या दारी येऊन मालाची खरेदी करतात. यंदा पर्जन्यमान निम्म्यावरच झाले आहे. त्यामुळे फळाची योग्य वाढ न झाल्याने त्याच्या पौष्टिकतेवरही परिणाम झाला आहे. केज तालुक्यात सुमारे २२५ हेक्टरमध्ये सिताफळाची लागवड करण्यात आली असून डोंगरमाथ्यावरील परिसरात सिताफळाचे अधिकचे क्षेत्र आहे. उन्हाळ्यात सिताफळांच्या झाडांची पाने गळतात व जून ते सप्टेंबर या फळधारणेच्या कालावधीतीच होणाऱ्या पावसामुळे सिताफळाच्या पौष्टिकतेमध्ये वाढ होते. बालानगर, टिपीसात, आर्द्रासहान वाणाचे सिताफळ जिल्ह्यात आढळून येतात. सिताफळाच्या या विविधतेमुळे भौगोलिक चिन्हांकरिता प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. केज बरोबर धारूर येथे ७० बीड तालुक्यात १११ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे.