शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीला स्थगिती

By admin | Updated: May 5, 2016 00:23 IST

उदगीर : उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमिततेवर बोट ठेवून जिल्हा उपनिबंधकांनी २१ एप्रिल रोजी संचालक मंडळ बरखास्त केले होते़

उदगीर : उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनियमिततेवर बोट ठेवून जिल्हा उपनिबंधकांनी २१ एप्रिल रोजी संचालक मंडळ बरखास्त केले होते़ त्याविरुद्ध संचालकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती़ बुधवारी झालेल्या सुनावणीत न्या़सुनिल देशमुख यांनी या बरखास्तीला स्थगिती दिल्याचा दावा संचालक मंडळाच्या वकीलांनी केला आहे़उदगीरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधकांकडे पोहोचल्या होत्या़ त्यांनी या तक्रारीच्या अनुषंगाने उदगीरच्या सहाय्यक निबंधकांना चौकशीचे आदेश दिले होते़ परंतु, चौकशी अधिकाऱ्यास चौकशीसाठी रेकॉर्ड उपलब्ध न करुन देणे, शेतकरी विमा योजना, बालिका बचाव योजनांना पणन मंडळाची परवानगी न घेताच मुदतवाढ देणे, रोजंदारी कर्मचारी, वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम अदा न करणे, अतिरिक्त खर्च करणे, माजी संचालकांना देण्यात आलेला अ‍ॅडव्हान्स वसूल न करणे, असे विविध ठपके ठेवत जिल्हा उपनिबंधक बी़एल़ वांगे यांनी २१ एप्रिल रोजी संचालक मंडळ बरखास्त केले होते़ तसेच प्रशासक म्हणून चाकूरचे सहाय्यक निबंधक लटपटे यांना नियुक्ती दिली़ परंतु, न्यायालयाच्या निर्णयानुसार १५ दिवसांची मुदत असल्याने या कालावधीत प्रशासकास पदभार घेता आला नाही़ यादरम्यान, संचालकांनी अ‍ॅड़व्ही़डी़ होन, अ‍ॅड़एमएस़ देशमुख, अ‍ॅड़यु़एल़ मोमले, अ‍ॅड़पद्माकर उगिले यांच्या माध्यमातून या निर्णयाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्याची सुनावणी बुधवारी पूर्ण होवून या बरखास्तीला स्थगिती देण्याचा निर्णय न्या़सुनिल देशमुख यांनी दिल्याचा दावा अ‍ॅड़मोमले यांनी केला़ यासंदर्भात उपनिबंधक बी़एल़ वांगे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांचा भ्रमनध्वनी बंद होता़ (वार्ताहर)वाद-प्रतिवाद रंगले़़़या निकालानंतर प्रतिवादी गटाकडून निर्णय स्थगितीचा नसून १५ जूनपर्यंत संचालक मंडळास संरक्षण दिल्याचा दावा करण्यात आला़ याबाबत अ‍ॅड़मोमले यांनी स्थगितीच्या निर्णयावर काही म्हणणे मांडायचे असल्यास १५ जूनपर्यंत प्रतिवाद्यांना संधी दिली असल्याचे सांगितले़आता लढून दाखवा़़़न्यायालयाच्या निर्णयानंतर माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांनी प्रसिद्धीपत्रक काढून द्वेषपूर्ण राजकारणास ही मोठी चपराक असल्याचे सांगत आमदार सुधाकर भालेराव यांना स्वत:च्या ताकदीवर लढण्याचे धाडस करावे, असे आव्हान दिले़