शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

निलंबन शिक्षेसाठी नसून त्यामुळे कलंकही लागत नाही...

By admin | Updated: July 21, 2015 00:19 IST

औरंगाबाद : निलंबन हे शिक्षेसाठी नसून त्यामुळे कुठलाही कलंक लागत नाही. तर निलंबन हे चौकशी करण्यासाठी केलेले असल्याचे सांगत

औरंगाबाद : निलंबन हे शिक्षेसाठी नसून त्यामुळे कुठलाही कलंक लागत नाही. तर निलंबन हे चौकशी करण्यासाठी केलेले असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी निलंबनाविरुद्ध चार शिक्षकांनी दाखल केलेल्या चार स्वतंत्र याचिका फेटाळून लावल्या. सहायक शिक्षिका शमा फिरदौस मोहम्मद हाजी, शिक्षक मोहम्मद अझर मोहम्मद अकबर, खान इम्रान खान उमर आणि गाझी मुदस्सीर अहमद नुरुल्ला हे जसवंतपुऱ्यातील राजधानी उर्दू स्कूलमधील शिक्षक आहेत. विविध बेकायदेशीर कारवाया केल्याप्रकरणी या चौघांना गुलशन शिक्षण प्रसारक मंडळाने निलंबित केले होते. हे निलंबन बेकायदा असून, रद्द करण्यात यावे, अशी मागणी करीत या चारही शिक्षकांनी स्वतंत्र याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या होत्या. या चारही याचिकांची एकत्रित सुनावणी न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्या खंडपीठासमोर झाली. या निलंबनाच्या आदेशात निलंबनाचा कालावधी नमूद नाही, तसेच चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती ही कायदेशीररीत्या गठीत केली नसल्याचे याचिकाकर्त्यांतर्फे न्यायालयात मांडण्यात आले. मात्र, हे निलंबन चार महिन्यांसाठी असून, चौकशी करण्यासाठी समिती नियमाप्रमाणे नियुक्त करण्यात आल्याचे प्रतिवादींच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून उपरोक्त मत नोंदवत खंडपीठाने चारही याचिका फेटाळून लावल्या. गुलशन शिक्षण प्रसारक मंडळातर्फे अ‍ॅड. अली झिशान व राजधानी उर्दू स्कूलतर्फे अ‍ॅड. प्रशांत नागरगोजे यांनी बाजू मांडली.