शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘त्या’बदल्यांना स्थगिती

By admin | Updated: June 6, 2016 00:19 IST

औरंगाबाद : अंबड तालुक्यातील सहशिक्षक व प्राथमिक पदवीधर शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे बदली आदेश जारी न करण्याचा अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. पाटील यांनी दिले आहेत.

औरंगाबाद : अंबड तालुक्यातील सहशिक्षक व प्राथमिक पदवीधर शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे बदली आदेश जारी न करण्याचा अंतरिम आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. पाटील यांनी दिले आहेत. ग्रामविकास विभागामार्फत १८ एप्रिल २०१४ व १५ मे २०१४ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे धोरण ठरविलेले आहे. १५ मेच्या शासन निर्णयानुसार बदल्यांचा प्राधान्यक्रम नमूद केला आहे. त्यानुसार नक्षलग्रस्त, आदिवासी भागातील कर्मचारी, आजारी कर्मचारी, आजी, माजी सैनिकाची पत्नी, कुमारिका कर्मचारी, विधवा कर्मचारी, ५३ वर्षे पूर्ण केलेले कर्मचारी, पती-पत्नी एकत्रीकरण कर्मचारी यांच्या बदल्यांना प्राधान्य देण्याचे सूचित करण्यात आले आहे. त्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठतेनुसार बदली करण्याचे सूचित केले आहे. अंबड पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वरीलप्रमाणे प्राधान्यक्रम देऊन बदल्यांसाठीची सेवाज्येष्ठता यादी ३० मे २०१६ रोजी प्रसिद्ध केली. परंतु राजकीय दबावापोटी गटशिक्षणाधिकाऱ्यांंनी १ जून २०१६ रोजी १५ मे च्या शासन निर्णयातील प्राधान्यक्रम लक्षात न घेता फेरसेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली. त्याद्वारे पती-पत्नी एकत्रीकरण धोरण डावलले. बदली प्रक्रिया ३ जून २०१६ रोजी ठेवली. त्यामुळे लक्ष्मण नागरे व इतर कर्मचाऱ्यांनी बदली प्रक्रियेस आव्हान दिले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सतीश तळेकर यांनी युक्तिवाद करून वरील बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. फेरसेवाज्येष्ठता यादी नियमबाह्य असून, त्यास स्थगिती देण्याची विनंती केली. याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. तळेकर काम पाहत आहेत. त्यांना अ‍ॅड. अमोल चाळक सहकार्य करीत आहेत. शासनातर्फे अ‍ॅड. ए. जी. मगरे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)राजकीय दबावापोटी गटशिक्षणाधिकाऱ्यांंनी १ जून २०१६ रोजी १५ मे च्या शासन निर्णयातील प्राधान्यक्रम लक्षात न घेता फेरसेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली. त्याद्वारे पती-पत्नी एकत्रीकरण धोरण डावलले.