शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

समूहशेतीला मिळणार पाठबळ!

By admin | Updated: May 28, 2014 00:24 IST

जालना : शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे, शेतीपूरक व्यवसाय उभारणे या माध्यमातून शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर ऊंचावण्यासाठी समूह शेतीच्या योजनेस पाठबळ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

जालना : शेतकर्‍यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळवून देणे, शेतीपूरक व्यवसाय उभारणे या माध्यमातून शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर ऊंचावण्यासाठी समूह शेतीच्या योजनेस पाठबळ देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. शेतकर्‍यांची कमी होणारी जमीन, शेतीसाठी भांडवल पुरवठा करताना येणार्‍या तांत्रिक अडचणी, जमिनीची कमी होत असलेली उत्पादकता तसेच कृषी विस्तारास असलेल्या मर्यादा आदी बाबींचा विचार करून गट शेतीस चालना देणे क्रमप्राप्त ठरले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा एकत्रित अवलंब करुन उत्पादन वाढीचा प्रयत्न करणे, उत्पादित मालाला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी शेतमाल विक्रीची सामूहिक व्यवस्था ही गरज बनत चालली आहे. बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणांचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शेतकर्‍यांचे संघटन करुन व आदर्श शेती पध्दतीचा वापर करुन उत्पादन व विक्री व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने शेतकर्‍यांच्या समूह/गट शेतीस चालना देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. शेतकर्‍यांचा गट तयार करुन समूह शेती ही योजना आगामी काळात राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत कृषी विस्तारामार्फत आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकर्‍यांना एकत्रित गटाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देता येणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक प्रश्नांची माहिती घेऊन शेतकर्‍यांचे वैयक्तिक प्रश्नसुध्दा सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. गटातील शेतकर्‍यांशी मोबाईलव्दारे संपर्क साधून हवामान, पीक उत्पादन, तंत्रज्ञान, कीड व रोग सर्वेक्षण आदींबाबत माहिती देण्यात येणार आहे. शेतकरी एकत्र आल्यामुळे त्यांचे संघटन होऊन गटामार्फत प्राथमिक प्रक्रिया विक्री यामध्ये शेतकरी सहभाग घेऊन अधिकाधिक उत्पन्न मिळण्यासाठी सहकार्य करतील. या देण्याची योजनेची अंमलबजावणी २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये करण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी संचालक (आत्मा) यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे निर्देश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. दरम्यान, या योजनेत जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी सहभाग नोंदविल्यास त्यांना निश्चितच फायदा मिळू शकतो. विशेषत: शेतीसाठी पाणी आणि उत्पादित मालाला जास्त भाव मिळेल, अशी आशा कृषी विभागाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी) शेतीवर आधारित व शेतीपूरक उद्योगांना चालना देणे आणि त्या माध्यमातून शोतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या मालास जास्तीत जास्त भाव मिळवून देणे, शेतकर्‍यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर ऊंचावणे यासाठी समूह शेतीची योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांना हवामान, पीक, उत्पादन, मालाचा बाजार भाव आदी माहिती मोबाईलव्दारे समूह सदस्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. सन २०१४-१५ या वर्षात शेतकर्‍यांच्या समूह/गट शेतीस चालना देण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्यास ५०.०० लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आली आहे. या रकमेतून योजनेच्या जनजागृतीसह अंमलबजावणीसाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करण्यात येणार आहे. ही योजना राज्यातील ३३ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली.