शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

बाजारपेठेत फळे-भाज्या, दुधाचा पुरवठा सुरळीत

By admin | Updated: June 7, 2017 00:28 IST

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या सहाव्या दिवशी शहरात आंदोलनाची तीव्रता कमी झाल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या सहाव्या दिवशी शहरात आंदोलनाची तीव्रता कमी झाल्याचे दिसून आले. जाधववाडीत पहाटे ११८ टेम्पो, ट्रक फळे व भाज्या दाखल झाल्या. तसेच सव्वा लाख लिटरच्या जवळपास दुधाचाही पुरवठा झाला. कर्जमाफीसह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी १ जूनपासून संप पुकारला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी जाधववाडीत काही व्यापाऱ्यांनी शेतकरी प्रतिनिधींना मारहाण केली होती. यामुळे जाधववाडीत तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आंदोलनाची तीव्रता कमी झाल्याने फळभाजीपाल्यांचा पुरवठा सुरळीत झाला होता; पण काल सोमवारी राज्यव्यापी बाजारपेठ बंदचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला होता. यास काही राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. यामुळे जाधववाडीत शेतकरी संघटना व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी येऊन दुकाने बंद ठेवण्याची विनंती केली होती. मुख्य बाजारपेठ बंद राहिल्याने त्याचा शहरातील भाजीमंडईतील आवकवर परिणाम झाला होता; पण मंगळवारी शहरातील आंदोलनाची तीव्रता कमी झाल्याचे जाणवले. जाधववाडी बाजारपेठेत मध्यरात्रीपासून फळे व भाज्या घेऊन ट्रक टेम्पो दाखल होऊ लागले होते. सकाळी नेहमीप्रमाणे फळभाज्यांचा अडत बाजार भरला होता; पण शेतकऱ्यांची (पान ५ वर)