शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

विकासकामावरून सुंदोपसुंदी

By admin | Updated: August 7, 2014 02:06 IST

औरंगाबाद : १०१ कोटी रुपयांची कामे बजेटमधून कापण्यात आल्यामुळे सर्व नगरसेवकांचा तीळपापड झाला

औरंगाबाद : महापालिकेतील नगरसेवकांची मागील ४ वर्षांपासून शिल्लक राहिलेली सुमारे १०१ कोटी रुपयांची कामे वर्ष २०१४-१५ च्या बजेटमधून कापण्यात आल्यामुळे सर्व नगरसेवकांचा तीळपापड झाला आहे. आज महापौर कला ओझा यांच्या दालनात झालेल्या बैठकीत युतीच्या नगरसेवकांनी कामे होत नसल्याची ओरड करून पदाधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचे खापर फोडले. बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नसून आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची उद्या ७ रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर शिल्लक कामे आणि बजेटमधील किती कामे करावयाची याचा निर्णय होणार आहे. विकासकामांचे अर्थकारण हे पुढील निवडणुकीच्या खर्चात दडलेले आहे. त्यामुळे शेवटच्या वर्षात दोन-चार विकासकामे झाली तर त्याचा अर्थपूर्ण फायदा मनपाच्या निवडणुकीत होईल. काही पदाधिकाऱ्यांनी स्वार्थासाठी कामांवर गदा आणल्यामुळे नगरसेवकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. काही ज्येष्ठ नगरसेवक वगळता सर्व नगरसेवकांची कामे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे. महापौरांच्या दालनातील बैठकीला उपमहापौर संजय जोशी, सभापती विजय वाघचौरे, सभागृह नेते किशोर नागरे, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, गटनेने मीर हिदायत अली, अनिल जैस्वाल, सूर्यकांत जायभाये, नितीन चित्ते, बन्सीलाल गांगवे यांची उपस्थिती होती. कशावरून आहे वाद?यावर्षीच्या बजेटमध्ये २२५ कोटी रुपयांची शिल्लक कामे होती. ती कामे बजेटमध्ये आली आहेत. मात्र, त्यामध्ये पुन्हा वॉर्डनिहाय कामांच्या याद्या घुसडल्या. २२५ कोटींची कामे ३२६ कोटींवर गेली. ही कामे कुणी घुसडली आणि त्यातील १०१ कोटींची कामे कुणी रद्द केली, यावरून वाद सुरू आहे.