शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम लागवडीला सुगीचे दिवस

By admin | Updated: November 18, 2014 01:07 IST

शिरीष शिंदे ,बीड पिकापेक्षा अधिक भाव कोषातून निर्माण होणाऱ्या रेशिमला मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत. गेल्या वर्षी रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १७७ होती.

शिरीष शिंदे ,बीडपिकापेक्षा अधिक भाव कोषातून निर्माण होणाऱ्या रेशिमला मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत. गेल्या वर्षी रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १७७ होती. यावर्षी या क्षेत्रात उतरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १५ नोव्हेंबर पर्यंत ३३० वर जाऊन पोहोचली आहे. ही संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. विशेष, म्हणजे बेरोजगार युवकही रेशीम उद्योग करु शकत असल्याने हा उद्योग जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जिल्ह्यात गेल्या चार वर्षांच्या कालावधीत फारसा पाऊस झाला नाही. एक वर्षापुर्वी दुष्काळ पडल्याने अनेक ठिकाणी पिके उगवूच शकली नाहीत. त्या पाठोपाठ गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास निर्सगाने ओढून घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. एकंदरीत शेती व्यवसाय हा संकटात सापडला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी विविध व्यवसाय करीत आहे. त्यात दुग्ध व्यवसाय, शेळी पालन यासारखे व्यवसाय करीत आहे. मात्र हे व्यवसायही अडचणीत आल्याने आता शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळले आहेत. रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचा चांगले उत्तपन्न मिळत असल्याने या व्यवसायात उतरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. तुतीची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना रेशिम आळीपासुन उत्पादन मिळत आहे. बीड येथील रेशीम कार्यालया मार्फत शेतकऱ्यांना रेशीम कोष बनविणाऱ्या आळ्यांची अंडी अनुदानस्वरुपात दिली जातात. त्यानंतर कोष निर्मिती झाल्यानंतर रेशीमला चांगला भाव मिळतो. जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत तयार झालेला कोष विकत घेतला जातो मात्र त्याचा भाव कमी असल्याने शेतकरी बँगलोर येथे रेशिमची विक्री करत असल्याचे समोर आले आहे.