शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रेशीम लागवडीला सुगीचे दिवस

By admin | Updated: November 18, 2014 01:07 IST

शिरीष शिंदे ,बीड पिकापेक्षा अधिक भाव कोषातून निर्माण होणाऱ्या रेशिमला मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत. गेल्या वर्षी रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १७७ होती.

शिरीष शिंदे ,बीडपिकापेक्षा अधिक भाव कोषातून निर्माण होणाऱ्या रेशिमला मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळत आहेत. गेल्या वर्षी रेशीम उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १७७ होती. यावर्षी या क्षेत्रात उतरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १५ नोव्हेंबर पर्यंत ३३० वर जाऊन पोहोचली आहे. ही संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. विशेष, म्हणजे बेरोजगार युवकही रेशीम उद्योग करु शकत असल्याने हा उद्योग जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जिल्ह्यात गेल्या चार वर्षांच्या कालावधीत फारसा पाऊस झाला नाही. एक वर्षापुर्वी दुष्काळ पडल्याने अनेक ठिकाणी पिके उगवूच शकली नाहीत. त्या पाठोपाठ गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास निर्सगाने ओढून घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. एकंदरीत शेती व्यवसाय हा संकटात सापडला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी विविध व्यवसाय करीत आहे. त्यात दुग्ध व्यवसाय, शेळी पालन यासारखे व्यवसाय करीत आहे. मात्र हे व्यवसायही अडचणीत आल्याने आता शेतकरी रेशीम उद्योगाकडे वळले आहेत. रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचा चांगले उत्तपन्न मिळत असल्याने या व्यवसायात उतरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. तुतीची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना रेशिम आळीपासुन उत्पादन मिळत आहे. बीड येथील रेशीम कार्यालया मार्फत शेतकऱ्यांना रेशीम कोष बनविणाऱ्या आळ्यांची अंडी अनुदानस्वरुपात दिली जातात. त्यानंतर कोष निर्मिती झाल्यानंतर रेशीमला चांगला भाव मिळतो. जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत तयार झालेला कोष विकत घेतला जातो मात्र त्याचा भाव कमी असल्याने शेतकरी बँगलोर येथे रेशिमची विक्री करत असल्याचे समोर आले आहे.