शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उन्हाळी सोयाबीनचे यशस्वी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:06 IST

कायगाव : सोयाबीन पिकाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गळनिंब, अगरवडगाव आणि भिवधानोरा या तिन्ही गावांत उन्हाळी सोयाबीनचे यशस्वी उत्पादन ...

कायगाव : सोयाबीन पिकाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गळनिंब, अगरवडगाव आणि भिवधानोरा या तिन्ही गावांत उन्हाळी सोयाबीनचे यशस्वी उत्पादन घेण्यात आले आहे.

कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली यंदा परिसरातील जवळपास ५० एकर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झालेली आहे. आता काही उन्हाळी सोयाबीन पिकांची काढणी पूर्ण झाली असून, काही पिके काढणीसाठी तयार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे पीक तयार झाले असून, त्यांना एकरी ९ ते १० क्विंटल सरासरी उत्पादन मिळाले आहे. तसेच उर्वरित क्षेत्रांतसुद्धा एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. कृषी विभागाने गेल्या हंगामातच पुढील हंगामात लागणारे बियाणे स्वतः तयार करण्याचे केलेले नियोजन या शेतकऱ्यांनी प्रयत्नपूर्वक सफल केले आहे. उन्हाळी पिकांमुळे परिसरातील चालू खरीप हंगामातील सोयाबीन बियाण्याचा प्रश्न मिटणार आहे. हेच बियाणे शेतकऱ्यांना पुढील पेरणीसाठी वापरता येणार आहे.

चौकट

कृषी विभागाच्या पथकाची भेट

शुक्रवारी अगरवाडगाव येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी पांडुरंग वाघ यांच्या सोयाबीनच्या क्षेत्राची तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी पाहणी केली. उन्हाळी सोयाबीन पीक पद्धतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी तारगे यांच्या उपस्थितीत खरीप पूर्व नियोजनबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी विष्णू मोरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक व्ही. ए. घोडके, कृषी सहायक मनीषा तागड, शेतकरी प्रवीण बोकडीया, पांडुरंग वाघ, पंढरी वाघ, बाळासाहेब वाघ, जगन्नाथ औटे, नानासाहेब म्हसरूप, रामेश्वर वाघ, अरुण खैरे, किशोर वाघ, निखिल गायकवाड, किशोर केरे, आदी शेतकरी हजर होते.

फोटो :

धनगरपट्टी शिवारात शुक्रवारी उन्हाळी सोयाबीन पिकांची पाहणी करताना.

070521\tarekh ahemad usuf shaikh_img-20210506-wa0033_1.jpg

धनगरपट्टी शिवारात शुक्रवारी उन्हाळी सोयाबीन पिकांची पाहणी करतांना.