शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
3
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
4
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
5
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
6
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
7
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
8
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
9
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
10
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
11
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
12
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
13
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
14
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
15
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
16
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
17
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
18
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
19
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
20
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 

संग्रामनगर येथे होणार भुयारी मार्ग

By admin | Updated: August 17, 2016 00:55 IST

औरंगाबाद : संग्रामनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर येत्या चार महिन्यांत भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार उड्डाणपूल उभारल्यानंतर

औरंगाबाद : संग्रामनगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर येत्या चार महिन्यांत भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार उड्डाणपूल उभारल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपातील रेल्वे गेट बंद करणे आवश्यक आहे; परंतु उड्डाणपूल उभारून दोन वर्षे उलटूनही संग्रामनगर येथील रेल्वे गेट सुरू आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे गेट बंद केले जाणार असून या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी भुयारी मार्ग बनविण्यात येईल. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून चार महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.रेल्वेगेट बंद केल्यामुळे प्रतापनगर, देवानगरी इ. भागांतील नागरिकांनी चार दिवसांपूर्वी रेल्वे रोको करत गेट कायमस्वरुपी सुरू ठेवण्यासाठी आंदोलन छेडले होते. दरम्यान या संदर्भात निर्णय घेण्याबाबत यासंदर्भात मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, खा.चंद्रकांत खैरे, दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. अखिलेश कुमार सिन्हा, राष्ट्रीय महामार्गाचे जिल्हा समन्वयक जे.यू.चामरगोरे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता ए.बी.सूर्यवंशी, रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता ए.एस.खैरे, महापालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, नगरसेवक नंदकुमार घोडेले यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आले. यावेळी संग्रामनगर रेल्वे क्रॉसिंग गेटवर चार महिन्यांत भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. तोपर्यंत आठवड्यातून एक दिवस दुरुस्तीसाठी वगळता रेल्वेगेट सुरू ठेवण्यात येईल. संग्रामनगर येथील उड्डाणपुलाची रुं दी वाढविणे आवश्यक आहे, असेही सिन्हा म्हणाले. रेल्वे स्टेशनसमोर वाहतूक बेट उभारल्यास वाहतूक स्वनियंत्रित होईल. यातून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. त्यामुळे यासंदर्भात चाचपणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी पांडे यांनी दिले.रेल्वे स्टेशन रोडसाठी आगामी आठ दिवसांत जागेचा ताबा देण्यात येणार असल्याचे सिन्हा यांनी स्पष्ट केले. तसेच रेल्वेस्टेशन एमआयडीसी, गोलवाडी, लासूर स्टेशन, दौलताबाद, कन्नड, चाळीसगाव रेल्वेगेटवर देखील लवकरच रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत.मंगळवारी पहाटे गेट खुले होताच आणि भुयारी मार्ग होणार असल्याची माहिती मिळताच प्रतापनगर, देवानगरी, दर्गा रोड, गादिया विहार, मयूरबन कॉलनी, पेशवेनगर, छत्रपतीनगर इ. भागांतील नागरिकांनी जल्लोष केला. ४रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीप्रसंगी श्रीमंत गोर्डे पाटील, प्रेम खडकीकर, संदीप कुलकर्णी, संग्राम पवार, योगेश वाणी, प्रशांत पाटील, रवी कवळे, प्रदीप मोरे, सुलोचना राऊत, रजनी महाजन, नंदा सोनाजे, प्रशांत देशमुख यांच्यासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.