शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गुन्हेगारांची यादी महिन्यात सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:24 IST

जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृती कमी करण्यासाठी गुन्हेगारांची यादी एक महिन्याच्या आत सादर करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी येथे दिले

दीपक केसरकर : संपूर्ण राज्यात सीसीटीव्ही बसविण्यात येणारजालना : व्यापारी नितीन कटारिया व गोविंद गगराणी यांच्या हत्येनंतर शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी व शांततेचे वातावरण टिकुन राहण्यासाठी कायदा व सुव्यवस्था आबाधित राहिली पाहिजे. जेणेकरुन गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने व पोलीस यंत्रणेने कडक कार्यवाही करावी. जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृती कमी करण्यासाठी गुन्हेगारांची यादी एक महिन्याच्या आत सादर करा, असे निर्देश गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी येथे दिले. तसेच राज्यात महत्त्वाच्या ठिकाणी लवकरच सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा व सुव्यवस्था आढावा बठकीत ते बोलत होते. बैठकीस पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, माजी आ. संतोष सांबरे, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, भाजपचे भास्कर दानवे, रामेश्वर भांदरगे, उद्योजक किशोर अग्रवाल, सतीश पंच, रमेश तवरावाला, दीपक भुरेवाल, डॉ. सुभाष अजमेरा, अर्जुन गेही, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर, ए.जे. बोराडे आदी उपस्थित होते.राज्यमंत्री केसरकर म्हणाले की, जालना हे व्यापारी शहर आहे. सध्या शहरात भुरट्या चोºयांचे प्रमाण वाढले असून, महिलांची छेडछाड होणार नाही तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेकरीता विशेष लक्ष देवून पोलीस यंत्रणेने गुन्हेगारी मोडून काढली पाहिजे. विविध समारंभ व उत्सवाच्या वेळेस पोलीस यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडतो. त्यासाठी शासन पोलीस अधिकारी कर्मचाºयांकरीता विविध सोयीसुविधा पुरवित असते. त्यांना हक्काची घरे असावी म्हणून शासन दराने घरे उपलब्ध करुन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेने गुन्ह्याच्या तांत्रिक बाबीची सखोल पडताळणी करुन कठोर शिक्षा होण्यासाठी गुन्हेगाराला तडीपार करण्याच्या सूचना देवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. यासाठी पोलिसांनी मनात विश्वास ठेवून बेधडकपणे कारवाई करावी. गुन्हेगारांना पाठीशी न घालता कुठल्याही गुन्हेगारांवर कारवाई होताना लोकप्रतिनीधी आड येणार नाही याची दक्षता घेवून शासन आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कायदा सुव्यवस्थेबाबत आ.राजेश टोपे यांनी ही आपले मत मांडले.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, शहराप्रमाणेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन समिती मार्फत ७० सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या पुढे संपूर्ण जिल्हाभर मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी करुन बसविण्यात येतील.अवैधरित्या प्लॉटींग व्यवसाय करणारे, वाळु माफिया, मटका चालवणाºया मुळ मालकांवर तसेच अवैध दारु विक्रेत्यांवर कडक कार्यवाही करुन गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीसांनी कडक कारवाई करावी यासाठी गरज भासल्यास गुन्हेगारावर राष्ट्रीय सुरक्षा (मोक्का) लावून गुन्हेगारांना हद्दपार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री लोणीकर यांनी दिल्या.या बैठकीस शहरातील व्यापारी, उद्योजक, पदाधिकारी व संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते....कटारिया कुटूंबियांचे सांत्वनतत्पूर्वी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे यांनी नितीन कटारीया यांच्या मोदीखाना येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेवून सांत्वन केले. शासन आपल्या पाठीशी असून आरोपींना कठोर शिक्षा होईल या दृष्टिने प्रयत्न केले जातील, असे राज्यमंत्री केसरकर यांनी सांगितले.....पालकमंत्र्यांच्या निर्णयाचे समर्थननितीन कटारीया व गोविंद गगराणी हत्या प्रकरणातील तपासात पोलीस प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केल्याबद्दल पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी समर्थन केले.