शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
3
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
4
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
5
"सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
6
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
7
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
8
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
9
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
10
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
11
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
12
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
13
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
14
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
15
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
16
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
18
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
19
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
20
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन

झेडपी’शाळांतील विद्यार्थ्यांना संगणकाचा लळा

By admin | Updated: September 4, 2014 01:24 IST

बालाजी आडसूळ , कळंब स्पर्धेच्या युगात संगणक ज्ञान नसणाऱ्यांची अवस्था निरक्षरांसारखी झाली आहे. त्यामुळेच आपल्या पाल्याला संगणकाचे किमान प्राथमिक ज्ञान मिळावे यासाठी आग्रही असतात.

बालाजी आडसूळ , कळंबस्पर्धेच्या युगात संगणक ज्ञान नसणाऱ्यांची अवस्था निरक्षरांसारखी झाली आहे. त्यामुळेच आपल्या पाल्याला संगणकाचे किमान प्राथमिक ज्ञान मिळावे यासाठी आग्रही असतात. मात्र ग्रामीण भागात सोयी-सुविधांचा अभाव, पालकांची जेमतेम आर्थिक स्थिती यामुळे या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही संगणकीय शिक्षणापासून वंचित रहावे लागत होते. परंतु शालेय शिक्षण विभागाने राबविलेल्या ‘आयसीटी’ या विशेष योजनेअंतर्गत तालुक्यातील ४० जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संगणकाचे धडे गिरवू लागले आहेत. सध्या शासकीय कार्यालये पेपरलेस होत असून, खाजगी अध्यापनाबरोबरच विविध ठिकाणी संगणकाचा नित्य वापर होत आहे. यामुळे डाटा एन्ट्रीपासून विविध दैनंदिन कामकाजाच्या सॉफ्टवेअरची मागणी वाढली आहे. यामुळे या क्षेत्रात कुशल मनुष्यबळासाठी अगणित संधी उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. यासंदर्भात शहरी भागात मोठ्या प्रमाणात संगणक शिक्षण देणाऱ्या संस्था व सोयी उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठीच राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत केंद्र पुरस्कृत माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान योजना राबविण्यात येत आहे. शिक्षण, अधिकार अधिनियमनानुसार माध्यमिक शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आता संगणक माहिती व तंत्रज्ञान हा विषयही अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ५०० शाळांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता. तर दुसऱ्या टप्प्यात २५०० व तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ५००० शाळांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये बहुतांश शाळा ग्रामीण भागातील असल्याने आर्थिकदृट्या दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत आहे. माध्यमिक शाळामधील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेतच संगणक शिक्षण व त्याद्वारे नियमित अभ्यासक्रमाची उजळणी करण्याची संधी या योजनेमार्फत उपलब्ध झाली आहे. बांधा, वापरा, हस्तांतरण तत्वाप्रमाणे या योजनेची राज्यात व्हेंडर्स नेमून अंमलबजावणी चालू आहे. यासाठी निवड करण्यात आलेल्या शाळात संगणक लॅब उभारून त्याचा नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त कालावधीत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व शालेय अभ्यासक्रमाचे दृकश्राव्य माध्यमातून अध्यापन केले जात आहे. यासाठी प्रत्येक शाळानिहाय स्वतंत्र प्रशिक्षक नेमण्यात आला आहे. संबंधित शाळात नेमलेल्या व्हेंडर्सनी १२ संगणक संच, दोन वेब कॅमेरे, स्कॅनर २, प्रोजेक्टर, ब्रॉडबॅन्ड कनेक्शनयुक्त प्रयोगशाळा उभारल्या आहेत.आयसीटी योजनेअंतर्गत दूसऱ्या टप्प्यात तालुक्यातील खामसवाडी, ईटकूर, मोहा, सावित्रीबाई फुले, विद्याभवन (कळंब), संभाजी विद्यालय (मंगरूळ), जि. प. प्रशाला मुलींची व मुलांची शाळा कळंब, हनुमान विद्यालय घारगाव या नऊ शाळांची निवड करण्यात आली आहे. तर तिसऱ्या टप्प्यात आंदोरा, आवाड शिरपुरा, भाटशिरपुरा, भोगजी, चोराखळी, गोविंदपूर, गौर, गौरगाव, ईटकूर, कळंब (३ शाळा), कन्हेरवाडी, खामसवाडी, कोथळा, खोंदला, लोहटा पूर्व, माळकरंजा, पानगाव, पाडोळी, बोरगाव, वाठवडा, शिराढोण, सौंदणा (अंबा), जवळा (खु.), येरमाळा, सापनाई, सातेफळ, शेळका धानोरा, ढोराळा या ३१ गावातील चाळीस शाळांचा समावेश आहे.