शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

पाठ्यपुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:04 IST

-- औरंगाबाद : शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन आठवडे सरले. जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली. मात्र, अद्याप पहिली ते ...

--

औरंगाबाद : शैक्षणिक सत्र सुरू होऊन तीन आठवडे सरले. जिल्ह्यात ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात झाली. मात्र, अद्याप पहिली ते आठवीच्या बहुतांश विद्यार्थ्यांना नव्या पाठ्यपुस्तकांचे संच वाटप झाले नसल्याने पुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन सध्या सुरू आहे. नव्या पुस्तकांचे संच जुलै महिनाअखेर पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक मिळण्याला ऑगस्ट महिना उजाडणार आहे.

गेल्या वर्षी पहिली ते आठवीच्या तीन लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण अभियानातून पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले होते. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना पुनर्वापरासाठी पुस्तके परत करण्याचे आवाहन केले. त्यानुसार जिल्ह्यातून १४ हजार १९ पालकांनी पुस्तके परत केली आहेत. कोरोनामुळे प्राथमिक विभागाच्या शाळा वर्षभर उघडल्याच नाही, तर पाचवी ते आठ‌वीच्या शाळा काही काळ उघडल्याने प्रत्यक्ष वर्ग भरले. त्यामुळे पुस्तकांचा फारसा वापर झाला नसल्याने ती सुस्थितीत आहेत. शाळा स्तरावर पुस्तकांच्या पुनर्वापरासाठी केलेल्या विनंतीला पालकांनी चांगला प्रतिसाद दिला, तर काही पुस्तकांचे संच शिक्षण विभागाकडे शिल्लक आहेत. त्यानुसार या वर्षीच्या पटावरील विद्यार्थी संख्येनुसार मागणी समग्र शिक्षा अभियानाकडून नोंदविली गेली. मुंबईहुन त्या मागणीची ऑनलाइन पडताळणी होऊन निश्चिती केली जाणार आहे. त्यानंतर मागणीनुसार पुस्तकांचा पुरवठा बालभारतीकडून केला जाणार असल्याचे स्वजल जैन यांनी सांगितले.

---

ब्रिज कोर्सच्या फलनिष्पत्तीवर प्रश्नचिन्ह

--

मागील वर्षी तांत्रिक अडचणीमुळे ३० टक्के विद्यार्थ्यांपर्यंतही ऑनलाईन शिक्षण पोहोचले नाही. याही वर्षी त्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी क्षमता विकास एनसीईआरटीचा ४५ दिवसांचा ब्रीज कोर्स सुरू झाला. मात्र, या अभ्यासक्रमाच्या पीडीएफ प्रिंटचा भुर्दंडही आहेच. शिवाय त्याच्या फलनिष्पत्तीवर शिक्षक, मुख्याध्यापकांकडून शंका उपस्थित केली जात आहे.

----

पुस्तकांची छपाई युद्धपातळीवर सुरू

--

बालभारतीकडून पुस्तकांची छपाई युद्धपातळीवर सुरू आहे. महिनाअखेरपर्यंत त्यांच्याकडून पुस्तकांचे संच उपलब्ध झाल्यावर त्याचे विद्यार्थ्यांना वाटप होईल. शाळांकडील शिल्लक पुस्तके, पुनर्वापरात आणलेली पुस्तके वजा करून पटावरील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार मागणी केलेली आहे. मागणीचा आकडा अंतिम होणे अद्याप बाकी आहे.

-डाॅ. बी. बी. चव्हाण, शिक्षणाधिकारी

-----