शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

विद्यार्थ्यांची हेळसांड

By admin | Updated: April 25, 2016 23:40 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड एकीकडे दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मुलांवर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे भटक्या विमुक्त प्रवर्गातील २४ हजार ३२८ विद्यार्थ्यांना वर्ष संपून

व्यंकटेश वैष्णव , बीडएकीकडे दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मुलांवर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे भटक्या विमुक्त प्रवर्गातील २४ हजार ३२८ विद्यार्थ्यांना वर्ष संपून गेले तरी शिष्यवृत्ती नसल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे.मागील चार वर्षांपासून विशेष समाजकल्याण विभागांतर्गत शिष्यवृत्ती प्रक्रिया आॅन लाईन केलेली आहे. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांतील मुख्याध्यापक-प्राचार्यांकडून वेळेत आॅन लाईन शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण कार्यालयाला प्राप्त न झाल्याने शासनाकडून शिष्यवृत्तीचा निधी आलेला नसल्याचे समाजकल्याण विभागाचे म्हणणे आहे.एकीकडे दुष्काळामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा भरमसाट पैसा आणायचा कुठून, अशी परिस्थिती आहे. यातच शासन व महाविद्यालय प्रशासनात कामकाजास विलंब होत असल्याने गोरगरीब विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वर्ष संपले तरी वंचित आहेत.जिल्ह्यात एकूण ५५ हजारांवर शिष्यवृत्तीधारक आहेत. यापैकी एस.सी., एस.टी. ओ.बी.सी., व्हीजेएनटी प्रवर्गातील २६ हजार ३२८ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.पुढील आठवडाभरात जिल्ह्यातील २६ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला आहे.संबंधित समाजकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक यांची उदासीनता असल्याचेही आरोपात म्हटले आहे.