शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

विद्यार्थ्यांची हेळसांड

By admin | Updated: April 25, 2016 23:40 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड एकीकडे दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मुलांवर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे भटक्या विमुक्त प्रवर्गातील २४ हजार ३२८ विद्यार्थ्यांना वर्ष संपून

व्यंकटेश वैष्णव , बीडएकीकडे दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मुलांवर शिक्षण सोडून देण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे भटक्या विमुक्त प्रवर्गातील २४ हजार ३२८ विद्यार्थ्यांना वर्ष संपून गेले तरी शिष्यवृत्ती नसल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी समोर आला आहे.मागील चार वर्षांपासून विशेष समाजकल्याण विभागांतर्गत शिष्यवृत्ती प्रक्रिया आॅन लाईन केलेली आहे. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांतील मुख्याध्यापक-प्राचार्यांकडून वेळेत आॅन लाईन शिष्यवृत्ती अर्ज समाजकल्याण कार्यालयाला प्राप्त न झाल्याने शासनाकडून शिष्यवृत्तीचा निधी आलेला नसल्याचे समाजकल्याण विभागाचे म्हणणे आहे.एकीकडे दुष्काळामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा भरमसाट पैसा आणायचा कुठून, अशी परिस्थिती आहे. यातच शासन व महाविद्यालय प्रशासनात कामकाजास विलंब होत असल्याने गोरगरीब विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वर्ष संपले तरी वंचित आहेत.जिल्ह्यात एकूण ५५ हजारांवर शिष्यवृत्तीधारक आहेत. यापैकी एस.सी., एस.टी. ओ.बी.सी., व्हीजेएनटी प्रवर्गातील २६ हजार ३२८ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.पुढील आठवडाभरात जिल्ह्यातील २६ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला आहे.संबंधित समाजकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक यांची उदासीनता असल्याचेही आरोपात म्हटले आहे.