शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाधार’साठी दुपटीने विद्यार्थी वाढले, पण शासनाकडून मिळतोय अपुरा निधी

By विजय सरवदे | Updated: December 2, 2023 19:02 IST

सन २०२२-२३ मधील पावणेपाच हजार विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : चालू शैक्षणिक वर्षाचे एक सत्र संपले, तरी अजूनही ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे, तर मागील शैक्षणिक वर्षातील सुमारे साडेचार ते पावणेपाच हजार विद्यार्थीदेखील या शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेतच आहेत. दरम्यान, मागणीनुसार पुरेसा निधीच प्राप्त होत नाही. त्यामुळे समाज कल्याण प्रादेशिक कार्यालयाने जालना जिल्ह्यात खर्च न झालेला सुमारे १ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडे वर्ग केला आहे. प्राप्त झालेल्या या निधीतून सन २०२०-२१, २०२१-२२ या वर्षातील सुमारे १००, तर २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील जवळपास १७५ विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

महापालिका हद्दीतील महाविद्यालयांमध्ये शिकणारे, परंतु वसतिगृहापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती दिली जाते. शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या तुलनेत अलीकडे दुपटी- तिपटीने विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, या शिष्यवृत्तीसाठी पुरेसा निधी प्राप्त होत नाही. त्यामुळे दरवर्षी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

इयत्ता अकरावी, बारावी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी साधारपणे ५१ हजार रुपयांपर्यंत स्वाधार शिष्यवृत्ती दिली जाते. ही योजना फक्त महापालिकेच्या ५ किलोमीटर हद्दीतील महाविद्यालयांत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच आहे.

त्रुटीत अडकले अर्ज५० टक्क्यांहून अधिक गुण असणारे मागासवर्गीय विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. सन २०२०-२१ या वर्षातील ८५ विद्यार्थी आणि २०२१-२२ या वर्षातील ३२५ विद्यार्थ्यांनी अर्जांतील त्रुटींची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे. या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे या कार्यालयाने आवाहन केले आहे.

किती निधी हवा‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी मागील शैक्षणिक वर्षातील सुमारे पावणेपाच हजार विद्यार्थ्यांना २१-२२ कोटी, तर चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी २५ ते २६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण