शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

‘स्वाधार’साठी दुपटीने विद्यार्थी वाढले, पण शासनाकडून मिळतोय अपुरा निधी

By विजय सरवदे | Updated: December 2, 2023 19:02 IST

सन २०२२-२३ मधील पावणेपाच हजार विद्यार्थ्यांना प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : चालू शैक्षणिक वर्षाचे एक सत्र संपले, तरी अजूनही ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. एवढेच नव्हे, तर मागील शैक्षणिक वर्षातील सुमारे साडेचार ते पावणेपाच हजार विद्यार्थीदेखील या शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेतच आहेत. दरम्यान, मागणीनुसार पुरेसा निधीच प्राप्त होत नाही. त्यामुळे समाज कल्याण प्रादेशिक कार्यालयाने जालना जिल्ह्यात खर्च न झालेला सुमारे १ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडे वर्ग केला आहे. प्राप्त झालेल्या या निधीतून सन २०२०-२१, २०२१-२२ या वर्षातील सुमारे १००, तर २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील जवळपास १७५ विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.

महापालिका हद्दीतील महाविद्यालयांमध्ये शिकणारे, परंतु वसतिगृहापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती दिली जाते. शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या तुलनेत अलीकडे दुपटी- तिपटीने विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, या शिष्यवृत्तीसाठी पुरेसा निधी प्राप्त होत नाही. त्यामुळे दरवर्षी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

इयत्ता अकरावी, बारावी तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी साधारपणे ५१ हजार रुपयांपर्यंत स्वाधार शिष्यवृत्ती दिली जाते. ही योजना फक्त महापालिकेच्या ५ किलोमीटर हद्दीतील महाविद्यालयांत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच आहे.

त्रुटीत अडकले अर्ज५० टक्क्यांहून अधिक गुण असणारे मागासवर्गीय विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. सन २०२०-२१ या वर्षातील ८५ विद्यार्थी आणि २०२१-२२ या वर्षातील ३२५ विद्यार्थ्यांनी अर्जांतील त्रुटींची पूर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे. या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाशी संपर्क साधावा, असे या कार्यालयाने आवाहन केले आहे.

किती निधी हवा‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी मागील शैक्षणिक वर्षातील सुमारे पावणेपाच हजार विद्यार्थ्यांना २१-२२ कोटी, तर चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांसाठी २५ ते २६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEducationशिक्षण