शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मुस्लीम संघटनांकडून लॉकडाऊनला कडाडून विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोना चक्रव्यूहामध्ये मागील वर्षभरात सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी अक्षरश: भरडले गेले आहेत. पुन्हा आठ दिवसांचा लॉकडाऊन कोणालाही ...

औरंगाबाद : कोरोना चक्रव्यूहामध्ये मागील वर्षभरात सर्वसामान्य नागरिक आणि व्यापारी अक्षरश: भरडले गेले आहेत. पुन्हा आठ दिवसांचा लॉकडाऊन कोणालाही परवडणारा नाही. हातावर पोट असलेल्या नागरिकांचे मरण होईल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनचा पुन्हा एकदा फेरविचार करावा या मागणीसाठी मुस्लीम संघटनांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे.

माजी नगरसेवक इलियास किरमानी यांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी विविध संघटनांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत लॉकडाऊनसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. मागील वर्षभरात व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले गेले. हातावर पोट असलेल्या नागरिकांची शहरात संख्या खूप मोठी आहे. आठ दिवस त्यांची उपजीविका कशी होईल यावर चर्चा करण्यात आली. कोरोनासंदर्भातही बैठकीत विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले. दोन वेगवेगळे मतप्रवाह या ठिकाणी पहायला मिळाले. पहिला लॉकडाऊन होऊ द्या, दुसरा लॉकडाऊन लावला तर त्याला विरोध करू असेही काही जणांनी नमूद केले. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर एक समिती निश्चित करण्यात आली. समितीमधील सदस्यांनी बैठकीतून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दूरध्वनीवर संपर्क साधला. सर्व प्रतिनिधींच्या भावना त्यांच्या कानावर घालण्यात आल्या. दहा जणांचे एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन लॉकडाऊनचा फेरविचार करावा, अशी मागणी करणार आहे. या बैठकीस इलियास किरमानी, कदीर मौलाना, सलीम सिद्दिकी, वाजेद इंजिनियर, इक्बाल अन्सारी, रशीद मौलाना, प्रा. मशू , मोईद हशर, मसियोद्दिन सिद्दिकी आदींची उपस्थिती होती.