शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

गावगुंडांवर कठोर कारवाई होणार...

By admin | Updated: January 23, 2017 23:47 IST

उस्मानाबाद : सन २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे़

उस्मानाबाद : सन २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे़ गुन्ह्यांच्या उलगड्यातही जिल्ह्याचा चांगला आलेख आहे़ कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत़ शहरी- ग्रामीण भागात तणावाचे वातावरण निर्माण होण्यास कारणीभूत असलेल्या गावगुंडांसह निवडणुकीत कायदा हातात घेणाऱ्या राजकीय गुंडांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी दिली़उस्मानाबाद येथील पोलीस मुख्यालयात सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ पाटील म्हणाले, डिसेंबर १६ अखेरपर्यंत दाखल खुनाच्या ४४ घटनांपैकी ३८ प्रकरणांचा उलगडा झाला असून, याचे प्रमाण ८६ टक्के आहे़ तर गतवर्षीच्या उलगड्याच्या प्रमाणात पाच टक्क्यांनी यात वाढ झाली आहे़ सदोष मनुष्यवधाच्या दाखल दोन्हीही प्रकरणांचा उलगडा झाला आहे़ खुनाच्या प्रयत्नाच्याही सर्वच्या सर्व प्रकरणांचा उलगडा झाला आहे़ या घटनांमध्ये दोनने घट झाली आहे़ दरोड्याच्या घटनांमध्येही चांगली घट झाली असून, दाखल सर्वच प्रकरणांचा उलगडा झाला आहे़ चोरी, जबरी, चोरी, घरफोड्या, इतर चोऱ्यांच्या घटनांमध्येही यंदा घट झाली आहे़ असे असले तरी या घटना उलगडा होण्याचे प्रमाण समाधानकारक नाही़ इतर प्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यांचा उलगडा होण्याचे प्रमाण हे २०१५ पेक्षा २०१६ मध्ये चांगले दिसून येत आहे़ २०१५ मध्ये ३७९५ जणांविरूध्द विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती़ तर २०१६ मध्ये यात मोठी वाढ झाली असून, ५७९० जणांविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे़ शिवाय अवैध धंद्यांविरूध्दही कारवाईत मोठी वाढ झाली आहे़ दोष सिध्दतेत १८ प्रकरणांमध्ये शिक्षा झाली असून, यात आठ खुनाच्या घटनांचा समावेश असल्याचेही पाटील यांनी सांगितले़ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीही प्रशासन प्रयत्न करीत आहे़ निवासस्थाने, पोलीस ठाण्याच्या नवीन इमारती, वाढीव मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठीही शासनदरबारी प्रशासनाचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पाटील यांनी दिली़ यावेळी अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे, सहाय्यक पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन, स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर आदी उपस्थित होते़(प्रतिनिधी)