शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शहरात साचले कचऱ्याचे ढिगारे

By admin | Updated: July 28, 2014 00:58 IST

जालना : नगर पालिका कर्मचाऱ्यांचा संप चार दिवसांपूर्वी संपला. ईद तोंडावर असतांनाही पालिकेचा स्वच्छता विभाग आळशीपणा झटकून कामाला लागण्यास तयार नाही.

जालना : नगर पालिका कर्मचाऱ्यांचा संप चार दिवसांपूर्वी संपला. ईद तोंडावर असतांनाही पालिकेचा स्वच्छता विभाग आळशीपणा झटकून कामाला लागण्यास तयार नाही. त्यामुळे नागरिकांतून पालिकेविषयी प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहे. अनेक भागात अजूनही पालिकेचे स्वच्छता कर्मचारी पोहोचले नाहीत. स्व. पापाखान यांच्यानंतर दु:खीनगरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दु:खीनगर वासियांची एवढी भयानक परिस्थिती आहे की, सर्वच गटारे तुंबली आहेत. कचऱ्याचे ढीग साचले आहेत. सर्वत्र चिखल माजला आहे. टोलेजंग इमारतींचा हा उच्चभ्रू वस्तीचा भाग अस्वच्छतेमुळे आता दुर्गंधीचा अड्डा बनला आहे. या भागातील नागरिक पालिकेच्या कारभारावर प्रचंड नाराज आहेत. मदिना चौक, कुरेशी मोहल्ला या भागात तर पायी चालणे अतिशय अवघड होऊन बसले आहे. गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. घाण व कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. चंदनझीरा भागातही प्रचंड कचरा साचला आहे. आ. गोरंट्याल यांच्या प्रयत्नातून एक चांगला रस्ता तयार करण्यात आला आहे. या भागात अलिकडच्या काळात औद्योगिक वसाहतीमुळे मुस्लिम वस्ती वाढली आहे. ईदचा असूनही पालिकेच्या वतीने या भागात कचऱ्याचे ढीग उपसण्यात आले नाहीत. पेन्शनपुरा या भागात प्रचंड मोठा कचऱ्याचा ढीग साचला आहे. गेल्या महिनाभरापासून हा ढीग उचलण्यात आला नाही. मुख्य रस्ता असूनही कचरा उचलण्यात आलेला नाही. या भागातील लोकांना रमजान महिन्यात प्रचंड त्रास सहन करावा लागला. तक्रार करूनही कोणीच दखल घेत नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. पालिकेच्या स्वच्छता विभागाने तर हा भाग वाळीत टाकल्याचे जाणवत आहे. छाईपुरा रहेमानगंज भागात मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. ईदगाहपासून हा भाग अगदी जवळ आहे. या ठिकाणाहून ईदगाहसाठी जाणाऱ्यांना मुख्य मार्ग आहे. मात्र ठिकणी साचलेला कचरा अजूनही उचलण्यात आला नाही. कादराबाद दर्गावेस भागात गटारीतून काढलेली घाणही आणून टाकली जाते. ईतवारा हा भाग स्वच्छ असला तरी कुच्चरवटा भागात घाणीचे साम्राज्य आहे.रमजान व श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर सफाई मोहीम राबविण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)स्वच्छता मोहीम राबविणार नगर पालिका कर्मचारी नुकतेच संपावरून परतले आहेत. संपूर्ण शहरात एकदाच सफाई केली जात आहे. टप्प्या-टप्प्याने ईदपर्यंत संपूर्ण शहर स्वच्छ केला जाईल, उपनगराध्यक्ष शाह आलम खान यांनी सांगितलेस्वच्छतेच्या कामाला गती देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वेळेवर कामावर येण्यासाठी स्वच्छता कामगारांवर कारवाई केली जात आहे. स्वच्छता विभागातील कामगारांचा आढावा घेतला आहे. काही भागात खाजगी व्यक्तींकडून स्वच्छता करून घेतली जात असल्याचे मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी सांगितले.