शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:22 IST

चिंचोली लिंबाजी : पूर्णा नदीपात्रातून गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. ...

चिंचोली लिंबाजी : पूर्णा नदीपात्रातून गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याने नागरिकांची झोप उडाली आहे. महसूल विभाग व पिशोर पोलीस वाळू उपसा रोखण्यात अपयशी ठरत असल्याने वाळूमाफिया सुसाट सुटले आहेत. दिवसेंदिवस वाळूमाफियांची वाढत चाललेली मुजोरी पाहून दिगाव ग्रामस्थांनी तहसीलदारांना अवैध वाळू उपसा थांबविण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून चिंचोली लिंबाजी परिसरातून गेलेल्या पूर्णा नदीपात्रातील दिगाव, खेडी, शेलगाव, वाकद, बरकतपूर, चिंचोली लिंबाजी, वाकी, नेवपूर या वाळूपट्ट्यांचा शासकीय लिलाव झालेला नाही. यामुळे वाळूतस्करांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेत पिशोर पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बेसुमार वाळू उपसा चालविला आहे. आर्थिक हितसंबंधामुळे महसूल व पोलीस विभाग याकडे कानाडोळा करून कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. यामुळे माफियांना रान मोकळे झाले आहे. वाळूमाफियांची मुजोरी वाढल्याने अंगणवाडी, घरकुल व इतर शासकीय कामांसाठी वाळू मिळत नसल्याने कामे रखडली आहेत. ग्रामस्थ नदीत वाळू भरण्यास गेल्यावर नदीकाठचे शेतकरी वाळू भरण्यास विरोध करतात. पैसे दिल्याशिवाय वाळू भरू दिली जात नाही. त्यामुळे नाईलाजाने सर्वसामान्य नागरिकांना तीन ते साडेतीन हजार रुपये मोजून वाळू विकत घ्यावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले. या आठही वाळूघाटांतून दररोज शेकडो ब्रास वाळू उपसा होत असताना संबंधित यंत्रणा मात्र अळी मिळी गुपचिळी भूमिका घेतल्याने सर्व काही आलबेल सुरू आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अवैध वाळू उपसा थांबवून वाळूचोरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौकट

कमाईमुळे अनेक पुढारी वाळूच्या धंद्यात

वाळूच्या धंद्यात मोठी कमाई होत असल्याने अनेक राजकीय पुढारी या धंद्यात सक्रिय झाले आहेत. रात्रभर नदीपात्रात वाळूचोरी करणाऱ्यांचे व रस्त्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांचे साम्राज्य दिसते. वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांच्या कर्णकर्कश आवाजामुळे ग्रामस्थांची अक्षरशः झोप उडाली आहे; परंतु रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या व महसूल प्रशासनाच्या भरारी पथकाच्या नजरेस ही वाहने आर्थिक चष्मा घातल्याने नजरेस पडत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.