शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय उत्सवांचे कार्यक्रम थांबवा

By admin | Updated: April 20, 2016 00:19 IST

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असलेले कमाल जमीन धारणा (सिलिंग), जमीन अधिग्रहण आणि अत्यावश्यक वस्तू कायदा हे कायदे रद्द करण्यात यावेत

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या दृष्टीने अन्यायकारक असलेले कमाल जमीन धारणा (सिलिंग), जमीन अधिग्रहण आणि अत्यावश्यक वस्तू कायदा हे कायदे रद्द करण्यात यावेत तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबेपर्यंत उद्घाटन, भूमिपूजन, सत्कार यासारखे शासकीय उत्सवाचे कार्यक्रम बंद ठेवावेत, अशी मागणी शेतकरीविरोधी कायदेविषयक परिषदेत मंगळवारी करण्यात आली. किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शहरातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही परिषद पार पडली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत अमर हबीब होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून अ‍ॅड. दिनेश शर्मा, अ‍ॅड. प्रकाशसिंह पाटील, अ‍ॅड. महेश भोसले आणि अच्युतराव गंगणे यांची उपस्थिती होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ज्यांना शेती करायची इच्छा आहे, त्यांना नीटपणे करू दिली जात नाही, ज्यांना इच्छा नाही त्यांना ती बळजबरीने करायला भाग पाडले जात आहे. हा ताण सहन न झाल्यामुळे शेतकरी जीवन संपवीत आहेत. शेतकऱ्यांच्या विपन्नावस्थेच्या मुळाशी शेतकरीविरोधी कायदे हे कारण आहे. देशात अशा कायद्यांची संख्या २५४ पेक्षा जास्त आहे. यामध्ये प्रामुख्याने सिलिंग, अत्यावश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा यासारख्या कायद्यांचा समावेश आहे. त्यामुळे आधी हे कायदे रद्द झाले पाहिजेत, असा सूर यावेळी उमटला. शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबेपर्यंत राज्य शासनाने सर्व शासकीय उत्सवाचे कार्यक्रम बंद करावेत, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. शासनाने उत्सवी कार्यक्रम थांबविले नाहीत, तर किसानपुत्र ते थांबवतील असा इशाराही देण्यात आला. डॉ. राम जाधव यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राजेश करपे यांनी केले. संविधान शत्रू नाही; पण तरतुदी नक्कीचसंविधानाने सर्वांना कायद्यापुढे समानतेचा अधिकार मान्य केलेला आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र तो लागू नाही. संविधानाच्या अनुसूची ९ मध्ये किती तरी अशा तरतुदी आहेत, ज्यामुळे शेतकऱ्याला अन्याय झाला तरी त्याविरोधात दाद मागता येत नाहीत. जमीन अधिग्रहणासारखा कायदा हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. शेती द्यायची की नाही हे ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्याला नाही. सर्वात आधी या तरतुदींवर घाव घालावा लागेल. भारताचे संविधान शेतकऱ्यांचा शत्रू नाही; परंतु त्यातील काही तरतुदी मात्र नक्कीच शत्रू आहेत, असे अ‍ॅड. महेश भोसले म्हणाले. समाजवाद्यांमुळेच शेतीचे नुकसानचुकीच्या धोरणांमुळे देशातील कृषी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे शेतीवर अवलंबून मराठा, पटेल, जाट यासारख्या बड्या जमाती आरक्षणाची मागणी करीत रस्त्यावर उतरल्या आहेत. आज कोणत्याही परिस्थितीत शेती परवडत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समाजवादी धोरणांचा अवलंब केला गेला. खरे तर जगातील कोणत्याही दोन व्यक्ती सारख्या असूच शकत नाहीत. त्यामुळे समानतेचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे, असे अ‍ॅड. दिनेश शर्मा म्हणाले.