शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

तरीही मुंबईसाठी रेल्वे आरक्षण वेटिंगवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाचा औरंगाबाद शहरात दुसऱ्यांदा कहर सुरू झाला असला तरी, मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गर्दी काही कमी होताना ...

औरंगाबाद : कोरोनाचा औरंगाबाद शहरात दुसऱ्यांदा कहर सुरू झाला असला तरी, मुंबईला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची गर्दी काही कमी होताना दिसत नाही. प्रवासासाठी फक्त ऑनलाइन आरक्षण प्रक्रिया सुरू असल्याने अनेकांना वेटिंगवर राहावे लागत आहे.

औरंगाबाद रेल्वेस्थानकावरून दररोज १७ रेल्वे येत-जात असून, आठवड्यातून दोन विशेष गाड्याही धावतात. मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांतून गर्दी असते. त्यामुळे मुंबईसाठी प्रवाशांची वेटिंग लिस्ट वाढतच आहे. हैदराबादकडे जाणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी असून, त्यासाठी मात्र प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागत नाही. येथून इतर राज्यात जाणारे प्रवासीही आहेत. रेल्वे स्टेशनवर गर्दी होत असून, त्यात वाढत्या कोरोनाची चिंता कुणालाही दिसत नाही.

परीक्षा अद्याप संपलेल्या नाही...

दरवर्षी विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या की प्रवाशांची गर्दी वाढत असते. परंतु कोविडमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा अद्याप झालेल्या नाही. अन्यथा ही गर्दी पुन्हा वाढली असती. स्थानकावर खबरदारी घेतली जात असली तरी प्रवाशांना ऑनलाइन टिकीट काढूनच प्रवासाला निघावे लागते. एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यावर गर्दी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

स्थानकावर विशेष खबरदारी

औरंगाबादेतून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने स्थानकावर त्यांचीच गर्दी दिसते. ऑनलाइन टिकीट घेऊन आणि मोबाइलमध्ये ऑनलाइन टिकीट दाखवून प्रवाशी रेल्वेस्थानकात प्रवेश करताना दिसत आहेत. येथेही प्रवाशांना अंतर राखूनच स्थानकात प्रवेश दिला जात आहे.

लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे कामगार आपल्या गावाकडे जाण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.

प्रवाशांना सेवा देण्याकडे लक्ष्य...

कोविडची संख्या वाढत असली तरी ती जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. आम्ही प्रवाशांना सेवासुविधा देण्यावर लक्ष्य ठेवून आहोत. येणाऱ्या प्रवाशांना काही अडचणी असल्यास त्यांना मदत केली जाते. प्लॅट फाॅर्मवरील गर्दी टाळण्यासाठी प्लॅट फाॅर्म तिकीट सुरू केले असल्याने अनेकदा फक्त प्रवासीच स्थानकात जात आहेत.

- रेल्वे अधिकारी, औरंगाबाद

कॅप्शन...

औरंगाबाद रेल्वेस्थानकावर प्रवाशांची अशी गर्दी दिसत आहे.