शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

अजूनही शौचालयांचे बांधकाम सदोषच

By admin | Updated: November 25, 2014 01:00 IST

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ असा मंत्र देणाऱ्या निर्मल भारत अभियानाला गेल्या १२ वर्षांत दोषमुक्त शौचालये उभारणे शक्य झालेले नाही. जिल्ह्यात बांधण्यात

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ असा मंत्र देणाऱ्या निर्मल भारत अभियानाला गेल्या १२ वर्षांत दोषमुक्त शौचालये उभारणे शक्य झालेले नाही. जिल्ह्यात बांधण्यात आलेली हजारो शौचालये तांत्रिकदृष्ट्या सदोष असून त्यातून पसरणारी दुर्गंधी, सततची पाणीटंचाई आणि ग्रामीण मानसिकता झटपट बदलण्यास तयार नसल्यामुळे वापराविना ही शौचालये शोभेची वस्तू बनली आहेत. गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत युनिसेफच्या एका पथकाने मे महिन्यात जिल्ह्यातील वैयक्तिक वापराच्या शौचालयांची पाहणी केली होती. त्यात अनेक शौचालये तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे वापरात नसल्याचे पुढे आले. भौगोलिक परिस्थितीनुसार कोणत्या पद्धतीची शौचालये बांधावीत याचे ठरलेले निकष चक्क पायदळी तुडविण्यात आले. विशेष म्हणजे, गवंड्यांना शौचालये बांधण्याचे विशेष प्रशिक्षण जिल्हा परिषदेतर्फे वेळोवेळी देण्यात आलेले आहे. युनिसेफचे सिनिअर स्टेट लेव्हल कन्सलटंट श्रीकांत नाव्हरेकर यांनी या सदोष बांधकामावर नेमके बोट ठेवले आहे. निर्मल अभियानाच्या १२ वर्षांच्या कालावधीत ३१ कोटी ९८ लाख ८२ हजार रुपये खर्च करून जिल्ह्यात २ लाख ८ हजार ६४८ शौचालये बांधण्यात आलेली आहेत; परंतु सध्या त्यातील अर्धेअधिक शौचालये वापरात नाहीत, अशी खळबळजनक माहिती समोर येते आहे.बहुतांश शौचालये ग्रामस्थांनी पाडून टाकली असून सदोष शौचालयांचा वापर आता जनावरांचा चारा, कोंबड्यांची खुराडे म्हणून वापरली जात आहेत. अनेक गावांतून पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे शौचालयांचा वापरही थांबलेला आहे. ४जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या २ लाख ८ हजार ६४८ शौचालयांपैकी ६८ हजार ५५६ शौचालये ही दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांची आहेत. जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील एकूण १ लाख १० हजार १९० कुटुंबे आहेत. ६२.२२ टक्के कुटुंबांकडे शासकीय योजनेतून शौचालये बांधण्यात आली. ४जिल्ह्यात दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) १ लाख ७४ हजार १०६ कुटुंबे असून त्यापैकी १ लाख ४० हजार ९२ कुटुंबांना शौचालये बांधून देण्यात आली आहेत. ही टक्केवारी ८०.४६ एवढी आहे. सरकारी आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ७३.३९ कुटुंबांकडे सध्या शौचालये आहेत.