शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अजूनही शौचालयांचे बांधकाम सदोषच

By admin | Updated: November 25, 2014 01:00 IST

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ असा मंत्र देणाऱ्या निर्मल भारत अभियानाला गेल्या १२ वर्षांत दोषमुक्त शौचालये उभारणे शक्य झालेले नाही. जिल्ह्यात बांधण्यात

शांतीलाल गायकवाड , औरंगाबाद‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ असा मंत्र देणाऱ्या निर्मल भारत अभियानाला गेल्या १२ वर्षांत दोषमुक्त शौचालये उभारणे शक्य झालेले नाही. जिल्ह्यात बांधण्यात आलेली हजारो शौचालये तांत्रिकदृष्ट्या सदोष असून त्यातून पसरणारी दुर्गंधी, सततची पाणीटंचाई आणि ग्रामीण मानसिकता झटपट बदलण्यास तयार नसल्यामुळे वापराविना ही शौचालये शोभेची वस्तू बनली आहेत. गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत युनिसेफच्या एका पथकाने मे महिन्यात जिल्ह्यातील वैयक्तिक वापराच्या शौचालयांची पाहणी केली होती. त्यात अनेक शौचालये तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे वापरात नसल्याचे पुढे आले. भौगोलिक परिस्थितीनुसार कोणत्या पद्धतीची शौचालये बांधावीत याचे ठरलेले निकष चक्क पायदळी तुडविण्यात आले. विशेष म्हणजे, गवंड्यांना शौचालये बांधण्याचे विशेष प्रशिक्षण जिल्हा परिषदेतर्फे वेळोवेळी देण्यात आलेले आहे. युनिसेफचे सिनिअर स्टेट लेव्हल कन्सलटंट श्रीकांत नाव्हरेकर यांनी या सदोष बांधकामावर नेमके बोट ठेवले आहे. निर्मल अभियानाच्या १२ वर्षांच्या कालावधीत ३१ कोटी ९८ लाख ८२ हजार रुपये खर्च करून जिल्ह्यात २ लाख ८ हजार ६४८ शौचालये बांधण्यात आलेली आहेत; परंतु सध्या त्यातील अर्धेअधिक शौचालये वापरात नाहीत, अशी खळबळजनक माहिती समोर येते आहे.बहुतांश शौचालये ग्रामस्थांनी पाडून टाकली असून सदोष शौचालयांचा वापर आता जनावरांचा चारा, कोंबड्यांची खुराडे म्हणून वापरली जात आहेत. अनेक गावांतून पाण्याची तीव्र टंचाई असल्यामुळे शौचालयांचा वापरही थांबलेला आहे. ४जिल्ह्यात बांधण्यात आलेल्या २ लाख ८ हजार ६४८ शौचालयांपैकी ६८ हजार ५५६ शौचालये ही दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबांची आहेत. जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील एकूण १ लाख १० हजार १९० कुटुंबे आहेत. ६२.२२ टक्के कुटुंबांकडे शासकीय योजनेतून शौचालये बांधण्यात आली. ४जिल्ह्यात दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) १ लाख ७४ हजार १०६ कुटुंबे असून त्यापैकी १ लाख ४० हजार ९२ कुटुंबांना शौचालये बांधून देण्यात आली आहेत. ही टक्केवारी ८०.४६ एवढी आहे. सरकारी आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ७३.३९ कुटुंबांकडे सध्या शौचालये आहेत.