शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

लाईट गुल झाल्याने एसटीची सेवा ठप्प

By admin | Updated: November 16, 2014 00:38 IST

औरंगाबाद : महावितरणने करार रद्द केल्याने संतापलेल्या जीटीएलने शुक्रवारी विविध भागांतील वीजपुरवठा खंडित करून शहरवासीयांना वेठीस धरले. अनेक भागांतील वीजपुरवठा शनिवारीही खंडितच होता.

औरंगाबाद : महावितरणने करार रद्द केल्याने संतापलेल्या जीटीएलने शुक्रवारी विविध भागांतील वीजपुरवठा खंडित करून शहरवासीयांना वेठीस धरले. अनेक भागांतील वीजपुरवठा शनिवारीही खंडितच होता. त्यातच वीजपुरवठ्याअभावी राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बससह विविध मार्गांवरील बससेवा विस्कळीत झाल्याने सर्वसामान्य प्रवासी, शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली.महामंडळातर्फे बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे तिकीट देण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनमध्ये प्रवासाचा मार्ग, जमा झालेली रक्कम आदी माहिती संगणकाद्वारे घेतली जाते. विविध मार्गांवर बस रवाना करण्याआधी ही माहिती घेतली जाते.शुक्रवारी दुपारनंतर सिडको बसस्थानकाचा वीजपुरवठा खंडित झाला. शिवाय शनिवारी सकाळी ८ वाजेनंतर येथील इन्व्हर्टर बंद पडले. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनमध्ये प्रवासाचा मार्ग टाकणे, जमा झालेली रक्कम याची माहिती घेण्यास, चार्जिंग आदींमध्ये अडचण निर्माण झाली. दुपारपर्यंत सकाळच्या सत्रातील रोकड जमा झालेली नव्हती. प्रवासाचा मार्ग न मिळाल्याने दुपारपर्यंत शहर बसेससह विविध मार्गांवरील बसेस आगारातच उभ्या होत्या.तिकीट मशीन मिळविण्यासाठी वाहकांना मोठी प्रतीक्षा करावी लागली, अशा परिस्थितीमुळे शहर बसेसचे वेळापत्रकच कोलमडले. यामुळे शाळा सुटण्याच्या वेळेत शहर बसेस न धावल्याने विद्यार्थ्यांची आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय झाली, अशा परिस्थितीत बॅटरींद्वारे कामकाज सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक येथील वीजपुरवठा खंडित झाल्याने जनरेटरद्वारे येथील कामकाज सुरळीत ठेवण्यात आले होते.२० शहर बसेस उभ्या सिडको बसस्थानकाच्या आवारात दुपारी जवळपास २० शहर बसेस उभ्या राहिल्या होत्या. यामध्ये औरंगपुरा, बजाजनगर, रांजणगावसह विविध मार्गांवरील बसेसचा समावेश होता. यामुळे या मार्गांवरील प्रवाशांची गैरसोय झाली.सेवा देण्याचा प्रयत्नवीजपुरवठ्याअभावी महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शिवाय, प्रवाशांचीही गैरसोय झाली; परंतु अशा परिस्थितीतही प्रवासी देण्यासाठी प्रयत्न केल्याचे स्थानक प्रमुख आर.बी. राजपूत यांनी सांगितले.