शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मेमध्येही पाणीपातळी तग धरून

By admin | Updated: May 25, 2014 01:10 IST

बीड: जिल्ह्यात सूर्य आग ओकत असला तरी समाधानकारक झालेल्या पावसाने जिल्ह्याची पाणीपातळी अद्यापही तग धरून आहे. याला अवकाळी पावसाचाही फायदा झाला आहे.

बीड: जिल्ह्यात सूर्य आग ओकत असला तरी समाधानकारक झालेल्या पावसाने जिल्ह्याची पाणीपातळी अद्यापही तग धरून आहे. याला अवकाळी पावसाचाही फायदा झाला आहे. यामुळे जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत पाणीटंचाई अल्प आहे. गतवर्षी जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला होता. यामुळे गाव, वाडी-वस्त्यांवरील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. यामुळे जिल्ह्यात पाचशेच्या वर टॅँकर सुरू करण्यात आले होते. त्यावेळी जिल्ह्याची पाणीपातळीही तब्बल ९ मीटरपर्यंत खालावली होती. नंतर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्याची पाणीपातळी वाढली आहे. अवकाळी पाऊस झालेल्या ठिकाणी पाणीपातळी अद्यापही तग धरून असल्याने अनेक ठिकाणी ग्रामस्थांना अद्यापही समाधानकारक पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या १२६ विहिरींवर पाणीपातळी घेण्यात आली असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या कार्यालयातून देण्यात आली. गतवर्षी जिल्ह्यात अल्प पाऊस झाल्याने पाणीपातळी ८.६२ पर्यंत खालावली होती. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने पाणीपातळी ७.४७ पर्यंत आली आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांत पाणीपातळी वाढली असली तरी बीड, केज व वडवणी तालुक्यातील पाणीपातळी अल्प प्रमाणात घटली आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून दिवसेंदिवस ऊन वाढत आहे. यामुळे शेतकर्‍यांसह सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरींची पाणीपातळी घटली आहे. तसेच विविध ठिकाणच्या कूपनलिकांचीही पाणीपातळी घटली आहे. अशा ठिकाणी आज पाणीटंचाई आहे. मात्र, ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला आहे तेथे पाणीपातळी तग धरून आहे. वरिष्ठ भू-वैज्ञानिक बी.एस.मेश्राम म्हणाले की, जिल्ह्याची पाणीपातळी अद्याप समाधानकारक आहे. यामुळे पाणीप्रश्न गंभीर नाही; परंतु काही ठिकाणी जलभरण व ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ सारखे उपक्रम राबविले जात नसल्याने तेथील पाणीप्रश्न गंभीर बनत आहे. यासाठी जनजागृती करण्याची गरज असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.(प्रतिनिधी) तालुका नमुना घेतलेल्या विहिरी पाणीपातळी वाढ/घट अंबाजोगाई १२ ७.०५१.७३ आष्टी २३ ७.८३ ०.४० बीड १७ ९.८९ - ०.४३ धारूर ०३ ७.२०१.५९ ेगेवराई १७ ८.६०२.२३ केज ०३ ७.९० - ०.१९ माजलगाव १६ ६.६५ ३.१५ परळी १० ४.०३२.८८ पाटोदा ०९ ६.२४ १.१५ शिरूर १० १०.३७ ०.४६ वडवणी ०६ ६.४५ - ०.३५