शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
2
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
3
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
4
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
5
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
6
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
7
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
8
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
9
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
10
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
11
खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
12
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
13
ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
14
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
15
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
16
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
17
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
18
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
19
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
20
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पाणीपुरवठ्याचे शटडाऊन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:31 IST

शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून शहरात पाणी येणे बंद झाले असून, मनपाने अचानक हे शटडाऊन घेतल्याने औरंगाबादकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. रविवारपर्यंत हा त्रास सहन करावा लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जायकवाडीपासून शहरापर्यंत ठिकठिकाणी दुरुस्ती करणे, जलशुद्धीकरणातील गाळ काढण्यासाठी ३६ तासांचा मेगा शटडाऊन घेतला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून शहरात पाणी येणे बंद झाले असून, मनपाने अचानक हे शटडाऊन घेतल्याने औरंगाबादकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. रविवारपर्यंत हा त्रास सहन करावा लागणार आहे.महापालिकेच्या जायकवाडी येथील पाणीपुरवठा केंद्रात वीज वितरण कंपनीने शुक्रवारी सकाळी ११ ते १ यावेळेत फक्त दोन तासांचा शटडाऊन घेतला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वीज कंपनीचे ३६ तासांचे शटडाऊन असल्याचे सांगून पाणीपुरवठा बंद केला. वास्तविक पाहता वीज कंपनीने एवढा मोठा खंड काळ मनपाकडे मागितलाच नाही. गुरुवारी वीज कंपनीने खुलासा करून महापालिकेचे पितळ उघडे केले. यापूर्वीही एकदा जायकवाडीत महापालिकेने वीजपुरवठ्यावर खापर फोडले होते. महापालिकेचा हा खोटारडेपणा वारंवार उघडकीस येत आहे.शुक्रवारी सायंकाळी पुन्हा पालिका प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक जाहीर करीत शटडाऊनसाठी महावितरणचेच नाव पुढे केले. सिद्धार्थ जलतरण तलाव दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यावेळीही मनपाने पुन्हा वीज कंपनीवरच खापर फोडले आहे.शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून शटडाऊन सुरू होताच फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. ८०० मि.मी. व्यासाच्या वाहिनीची डागडुजी करण्याचे कामही हाती घेतले आहे. रिसायकल युनिटचीही स्वच्छता केली जात आहे. फिडरवरील १७ वॉलची दुरुस्तीही केली जात आहे. ढोरकीन येथे २४ लाख लिटर पाणी क्षमतेच्या जलकुंभातील गाळ काढला जात आहे, तर जायकवाडी पंपगृहाच्या ठिकाणी ३ ठिकाणी वेल्डिंगचे काम हाती घेतले आहे. शहरात रेल्वेस्टेशन परिसर, पदमपुरा टाकसाळी मंगल कार्यालय आदी ठिकाणी जलहिनीच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी दिली.