शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जुन्या जालन्यावर जलसंकट कायम

By admin | Updated: February 22, 2017 00:04 IST

जालना: जुना जालना भागावर दहा दिवसांपासून असलेले जलसंकट अजून, चार दिवस कायम राहणार आहे.

जालना: जुना जालना भागावर दहा दिवसांपासून असलेले जलसंकट अजून, चार दिवस कायम राहणार आहे. जायकवाडी ते जालना दरम्यान दुरूस्त केली जलवाहिनी तसेच व्हॉल्व्ह पुन्हा निकामी झाल्याने पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी कळविले आहे. नऊ फेब्रुवारी रोजी जायकवाडी ते जालना जलवाहिनी दुरूस्तीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तीन दिवसांत काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले. मात्र, तांत्रिक कारणांमुळे आठ दिवसांनंतरही पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. अंबड ते पाचोड मार्गावरील रहाटगावाजवळील व्हॉल्व्ह रविवारी दुरूस्त करण्यात आला. दोन ते तीन दिवस काँक्रिटचे काम सुकण्यासाठी गेले. सोमवारी पाणी पुरवठा होईल, असे अपेक्षित होते. मंगळवारी दुपारपर्यंत पाणी येईल असे पालिकेकडून सांगण्यात आले. मंगळवारी दुपारी व्हॉल्व्ह पुन्हा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. दुपारनंतर पाणी बंद करून व्हॉल्व्ह दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. हे काम पुढील चार दिवस सुरू राहणार आहे. पालिकेने चार दिवसांचा अवधी दिला असला तरी प्रत्यक्षात आठवडा लागण्याची चिन्हे आहेत. एकूणच जुना जालना भागाला पंधरा ते वीस दिवसांनी पाणी मिळणार आहे. दहा दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पाणी कोठून आणावे असा संतप्त सवाल नागरिक व्यक्त करीत आहेत. मंगळवारी पाणी येणार असल्याने अनेकांनी दिवसभर पाण्याची प्रतीक्षा केली. मात्र, पाणीपुरवठा न झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दहा ते बारा दिवसांपासून गांधीचमन, संजय नगर, दु:खीनगर, भाग्यनगर, गोकुळनगर, मोतीबाग परिसर कचेरी रोड, गवळी मोहल्ला, नूतन वसाहत मंमादेवी नगर, लहुजीनगर, समर्थनगर आदी अनेक भागांत पाणीपुरवठा झालेला नाही. रस्त्यांची कामे सुरू असल्याने नागरिकांना टँकरने पाणी आणणे जिकिरीचे झाले आहे. प्रत्येक कुटुंबाकडे कूपनलिका नाही. त्यामुळे काही भागात नगर पालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगारिकांतून होत आहे. पुढील चार ते पाच दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)