शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

खड्डेमय रस्त्यांचा ‘एसटी’ला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2016 00:14 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी करण्यात आलेली घोषणा खड्ड्यात गेली आहे. काही ठिकाणी खड्डे थातुरमातुर भरले तर काही ठिकाणी निधीच नाही म्हणून काम झाले नाही,

औरंगाबाद : मराठवाड्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी करण्यात आलेली घोषणा खड्ड्यात गेली आहे. काही ठिकाणी खड्डे थातुरमातुर भरले तर काही ठिकाणी निधीच नाही म्हणून काम झाले नाही, अशा खड्डेमय रस्त्यांचा ‘एसटी’ला सर्वाधिक फटका सहन करावा लागत आहे. वारंवार स्प्रिंग तुटणे, टायर खराब होण्यासह संपूर्ण ‘एसटी’च खिळखिळी होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील विविध गावांपर्यंत पोहोचविणाऱ्या रस्त्यांची अवस्था आजघडीला अत्यंत वाईट झालेली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे सर्वसामान्य वाहनधारकांचे हाल तर होत आहेतच; परंतु सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ‘एसटी’ला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ‘एसटी’तून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना खड्डेमय रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यांमधून सातत्याने ये-जा केल्यामुळे बसगाड्यांचे स्प्रिंग तुटण्यासह विविध पार्टस् खराब होत आहेत. या अनेक बसगाड्यांचे टायर ऐन रस्त्यात पंक्चर होत आहेत. अनेकदा दुसरे टायर उपलब्ध नसते. अशा वेळी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यासाठी धावपळ होते. विभागीय कार्यशाळेत दुरुस्तीसाठी येणाऱ्या बसेसमध्ये पैठण, सिल्लोड, कन्नड आगारातील बसगाड्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. खराब रस्त्यांमधून वारंवार बसेस गेल्यामुळे संपूर्ण बॉडीच खराब होत आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी महामंडळही संबंधित विभागाशी वेळोवेळी चर्चा करीत आहे.