शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

एसटी महामंडळाचा आंधळा कारभार !

By admin | Updated: December 13, 2014 23:50 IST

सूर्यकांत बाळापूरे , किल्लारी प्रवाशांच्या सेवेसाठी असे ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या आंधळ्या कारभारामुळे प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़

सूर्यकांत बाळापूरे , किल्लारीप्रवाशांच्या सेवेसाठी असे ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या आंधळ्या कारभारामुळे प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़ परिणामी, अवैध वाहतुकीकडे प्रवाशांचा कल असल्याचे पहावयास मिळत आहे़एसटी प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो़ विशेषत: ग्रामीण भागाच्या विकासासाठी महाराष्ट्र एसटी महामंडळाचे योगदान महत्त्वाचे मानले जाते़ त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा खाजगी वाहतुकीपेक्षा एसटीने प्रवास करण्यावर सर्वाधिक भर असल्याचे पहावयास मिळते़ परंतु, एसटी महामंडळाच्या आंधळ्या कारभारामुळे प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़ गेल्या ६४ वर्षांपासून एसटी महामंडळ कार्यरत आहे़ त्यामुळे प्रवाशांच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहेत़ त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्नशील असले तरी काही बाबींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे पहावयास मिळत आहे़ गेल्या तीन - चार महिन्यांच्या कालावधीत डिझेलच्या दरात जवळपास ६ ते ७ रुपयांनी कपात झाली आहे़ परंतु, एसटी महामंडळ तिकीटाचे दर करण्यास टाळत आहे़ एखाद्यावेळी डिझेलच्या दरात वाढ झाल्यानंतर हेच कारण पुढे करीत तिकीटाच्या दरात एसटी महामंडळ वाढ करते़ परंतु, डिझेलचे दर कमी झाले असतानाही दरात कपात केली जात नाही़ परिणामी, प्रवाशी एसटी ऐवजी खाजगी वाहतुकीकडे वळत आहेत़ त्याचबरोबर अपंग, महिला, ज्येष्ठ नागरिक, आमदार आदींसाठी बसमध्ये राखीव आसन असतात़ हे राखीव आसन ओळखता यावे म्हणून आसनाच्या वरील बाजूस ठळक अक्षरात लिहिलेले असतेही़ परंतु, या राखीव जागांवर अन्यच मंडळी बसलेले पहावयास मिळतात़ परिणामी, ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंगांना अनेकदा उभारुन प्रवास करावा लागतो़ एखाद्याने तक्रार केल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते़ त्यामुळे जर हे राखीव आसन नसतील तर आसनावर लिहून प्रवाशांची दिशाभूल कशासाठी करायची असा सवाल होत आहे़ अनेकदा बसचालक व वाहक थांब्यावरही बस थांबविण्यास टाळाटाळ करीत असतात़ त्यामुळे अनेकदा विनंती करावी लागते़या मार्गावरुन धावणाऱ्या बहुतांशी बससेमध्ये कचरा पडलेला असतो़ वास्तविक पहाता, एसटी बसेसची दररोज स्वच्छता करणे आवश्यक आहे़ बसची दररोज स्वच्छता करण्यात यावी म्हणून प्रत्येक नवीन बसला केरसुनीही देण्यात येते़ परंतु, ही कुठे गायब झालेली असते़ हा संशोधनाचा विषय ठरत आहे़ त्यामुळे प्रवाशांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़४डिझेलचे दर कमी झाल्याने तिकीट दरात कपात करावी, अशी प्रवाशांतून मागणी होत आहे़ परंतु, तिकीट दर कमी करण्याचा निर्णय हा महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडे घेते़ त्याचबरोबर बसमधील आसन राखीव ठेवण्यासाठी त्याची नोंद करणे आवश्यक असल्याचे एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक डी़ बी़ माने यांनी सांगितले़