शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

पालिकेचा रुग्णांच्या जीवाशी खेळ

By admin | Updated: January 3, 2016 00:34 IST

महापालिकेच्या वाशी रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अपघातग्रस्त व इतर अजारांनी त्रस्त गरीब रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होऊ लागला आहे. अपघातग्रस्तांनाही

इंडिया विरुद्ध भारत : परिसंवादातील निघाला सूर अमरावती : राष्ट्रपिता महात्मा गांधींनी म्हटले होते की, खरा भारत हा खेड्यात राहतो. खेड्यांचा व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास झाला तरच भारताची प्रगती होईल. परंतु सद्यस्थितीत जागतिकरणाच्या युगात शहरीकरण झाले आहे व सर्व अत्याधुनिक सुविधा शहरात झाली. भारत स्वतंत्र झाला तेव्हा ३५ कोटी लोकांपैकी २८ कोटी लोक खेड्यात राहत होते. तेव्हा शेतीचा विकासाचा दर ५८ टक्के होता. पण आता ७० टक्के लोक शेतीवर आधारित असतानाही ग्रामीण भागाचा विकास नाही. त्यामुळे इंडिया विरुद्ध भारत, अशी स्थिती झाली आहे. याविषयावर जागतिक मराठी अकादमी 'शोध मराठी मनाचा' संमेलनात व्यासपीठावर या क्षेत्रातील तज्ज्ञांना आयबीएन 'लोकमत'चे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे व पत्रकार व कवी विजय चोरमारे यांनी त्यांना बोलते केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक श्याम मानव, केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष गिरीश गांधी व जेष्ट साहित्यिक उल्हास पवार यांनी इंडिया विरुद्ध भारत या विषयावर अभ्यासू विचार उपस्थितांसमोर ठेवले. ज्येष्ठ साहित्यिक उल्हास पवार म्हणाले की, काँग्रेस पक्ष देशाच्या उदयाला कारणीभूत आहे. काही चुका झाल्या असतील पण विकासही देशाचा झाला आहे. त्यावेळेस गांधीजी मानवता, समता, सामाजिक नीतिमूल्य जपणारे होते. ते टिळकांना भेटले तेव्हा त्यांना सांगितले होते की, हिमालयाला भेटलो व गोखलेंना भेटलो तेव्हाच जलगंगेला भेटला. हा किस्सा ऐकवीत ते पुढे म्हणाले की, अमरावती शहर म्हणजे गाडगेबाबा, तुकडोजी महाराज व गुलाबराव महाराजांच्या आशीर्वादाने या शहराला प्रेरणा मिळाली. परंतु आजची व्यवस्था ही चंगळवादी झाली आहे. भारतीय लोकांची मानसिकता बदलण्याची वेळ आहे. जगातील सर्व मोठी लोक हे ग्रामीण भारतातील असून जोपर्यंत आपण इंडिया व भारत समजून घेणार नाही तोपर्यंत यामधील दुरी कमी होणार नसल्याचे ते म्हणाले. श्याम मानव चर्चेत भाग घेत म्हणाले, आपण सध्या विकासाची चर्चा करतो आहे. सध्या खुल्या बाजार व्यवस्थेमध्ये शोषण करणारा म्हणजे इंडिया व शोषित होणारा म्हणजे भारत, अशी व्याख्या केली. त्यावेळेस बाजार पद्धत उपलब्ध नव्हत्या म्हणून शेतकरी तीन पायल्या देऊन दोन पायल्या घेऊन यायचे. पण आज तो चार पायल्या दिल्या तर एक पायली घेऊन येतो, अशी परिस्थिती झाली आहे. खुल्या अर्थव्यवस्थेने ही दरी वाढविली आहे. गांधीजी जिवंत असते तर भारताचे इंडिया होऊ दिला नसता, असा उल्लेखही त्यांनी केला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आधुनिक भारताचा पाया रोवला व जगातील सर्वात मोठी लोकशाही स्वीकारली. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी यवतमाळ जिल्ह्याचा आहे. येथे सर्वात जास्त आत्महत्या झाल्या आहेत. जोपर्यंत शेतमालाला त्याच्या उत्पादन मूल्यानुसार बाजारभाव उपलब्ध करून देणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाही. गिरीश गांधी आपले अभ्यासू विचार मांडत म्हणाले की, नेहरुजींच्या काळात पहिली पंचवार्षिक योजना करण्यात आली. ही शेतीप्रधान व कृषिप्रधानला महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते. परंतु अलीकडच्या काळात शेतकऱ्यांवर अन्याय होत गेले. खेड्यात ग्रामीण भारत आहे. हे राजकारण्यांनी समजून घेतले नाही. पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना राबवितात. पण आता पाणी अडवा व नेत्यांची जिरवा असे सुरू असल्याचे त्यांनी विनोदाने सांगितले. आधी खेडी सुरक्षित होती. पण आता शहरात सुविधा आहेत. खेड्यांमध्ये उत्तम रस्ते, दवाखाने, चांगले शिक्षण दिले असते तर भारताचा इंडिया झाला नसता व एवढी दुरी निर्माण झाली नसती. अण्णा हजारेबद्दल मतभेद काहीही असो. पण राळेगणसिद्धीमध्ये कुठल्याही पाणठेल्यावर तंबाखू मिळू नये. हे ग्रामीण भारतातील अण्णांनी सिद्ध केलेले मोठे यश आहे. अण्णा हजारेंनी ग्रामीण भारताला महत्व पटवून दिले, असा उल्लेखही गांधींनी यावेळी केला. यावेळी भरत दौंडकर (पुणे) या युवा कवींनी ‘गोफ’ ही शेतकऱ्यांच्या वेदना सांगणारी कविता सादर करुन उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले तर आदिवासी कवी तुकाराम धांडे यांनी ‘साइब’ ही कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली. संचालन साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केले तर आभार सोमेश्वर पुसदकर यांनी मानले. (प्रतिनिधी)