शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

अध्यात्मही ‘सेलेबल’ आवरणात लोकांपुढे होतेय सादर

By admin | Updated: January 3, 2015 00:17 IST

औरंगाबाद : एरव्ही विद्वान, संशोधक व अभ्यासक अशी विशेषणे लागलेली माणसे शिष्ट, गंभीर आणि आत्ममग्न असतात असे चित्र असते.

औरंगाबाद : एरव्ही विद्वान, संशोधक व अभ्यासक अशी विशेषणे लागलेली माणसे शिष्ट, गंभीर आणि आत्ममग्न असतात असे चित्र असते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे हे मात्र याला अपवाद आहेत. संत साहित्य अभ्यासाच्या भरीव कामगिरीसह इतिहास लेखन, नाटक, कविता, अशा क्षेत्रातही त्यांनी यशस्वी मुशाफिरी केली आहे. उत्तम कीर्तनकार म्हणून ते महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांच्या तरुण विद्यार्थ्यांनाही ते समकालीन वाटतात. आज (३ जानेवारी) पसायदान प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात ‘शोध महाराष्ट्राचा’ या विषयावर ते बोलणार आहेत. त्यानिमित्त ‘लोकमत’ ने त्यांच्याशी साधलेला संवाद.ल्ल साहित्य संमेलनात केले जाणारे बहुतेक ठराव प्रत्यक्षात मूर्तरुपात येतच नाहीत. यावेळी काय होणार?डॉ. मोरे - हे असे होते हे खरेच. मात्र, त्यासाठी एकटा संमेलनाध्यक्ष काही करू शकत नाही. संमेलनाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या रसिकांनीही या ठरावांचे पुढे काय होते याचा मागोवा घेतला पाहिजे. हे ठराव केवळ कागदावरच राहू नयेत, यासाठी आग्रही भूमिका घेतली पाहिजे. ल्ल युवा साहित्य संमेलन निधीच्या मंजुरीअभावी रखडले आहे. ते व्हावे याबाबत आपण आग्रही राहणार का? डॉ. मोरे - हो, तरुणांसाठीचे स्वतंत्र युवा साहित्य संमेलन व्हावे ही माझी पूर्वीपासूनचीच भूमिका आहे. या संमेलनात मी ती आग्रहीपणे मांडणार आहे. सोबतच अखिल भारतीय साहित्य संमेलनही तरुणांना आपलेसे वाटावे असा माझा प्रयत्न आहेच. ल्ल आजचा तरुण आणि वाचन संस्कृती यांचे नाते कसे आहे, असे तुम्हाला वाटते?डॉ. मोरे - मी तसा सतत तरुणांमध्ये वावरत असतो. त्यातील बहुतेकांना संत साहित्य, त्यातील संशोधन, गंभीर अभ्यास विषय यात रुची असल्याचे मला जाणवते. तरुण काय वाचतो यापेक्षा त्याला वाचण्याजोगे सकस काय दिले जाते हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो आणि हो, आजचा तरुण तंत्रप्रवण आहे. थेट पुस्तके वाचत नसला तरी तो संगणक, इंटरनेट मोबाईल, अशा अनेक माध्यमातून वाचन संस्कृती समृद्ध करीत असतो. ल्ल भोवतालच्या सामाजिक प्रश्नांवर आपले साहित्यिक जाहीर भूमिका घेत नाहीत, अशी टिप्पणी केली जाते....डॉ. मोरे - लेखन हीच त्या साहित्यिकाची एक स्वतंत्र भूमिका असते, असा विचार आपण का करत नाही? लिखाणाला तो एक साधन म्हणून वापरत असतो. वैयक्तिक, सामाजिक अशी सर्व अभिव्यक्ती त्या माध्यमातून तो करतोच. अर्थात ही अभिव्यक्ती अधिकाधिक निर्भीड, स्वतंत्र व्हावी यासाठीचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले पाहिजेत. ल्ल आपण ज्या संत परंपरेचे पुरस्कर्ते आहात तिथे कर्मकांड व बुवाबाजीला कडाडून विरोध झाला. आज मात्र अध्यात्माचे विकृत आणि फसवे रूपच अधिक लोकप्रिय होते आहे, असे का होते आहे? आणि यावर उपाय काय?डॉ. मोरे - आज सगळ्याच गोष्टीत लोकांना शॉर्टकट हवा आहे. अध्यात्मिकतेचे क्षेत्रही याला अपवाद राहिले नाही. या ग्लोबल युगात अध्यात्मही चकचकीत, सेलेबल आवरणात लोकांपुढे सादर केले जाते. लोकही त्याला भुलतात. वारकरी संप्रदाय मात्र, कुठलाही शॉर्टकट सांगत नाही. अध्यात्मिकतेच्या नावावर जे काही खपवले जाते, त्याची कठोर चिकित्सा करीत राहाणे हाच यावरचा उपाय आहे.