शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

विशेष व्यक्तींना न्याय मिळेना

By admin | Updated: January 15, 2016 00:16 IST

औरंगाबाद : विशेष व्यक्तींसाठी ज्याप्रमाणे कामे व्हायला हवीत, तशी होत नाहीत. या व्यक्तींसाठी असलेल्या संबंधित विभागांमधील अधिकारीही सामाजिक जबाबदारीपेक्षा नोकरी म्हणूनच काम करीत आहेत.

औरंगाबाद : विशेष व्यक्तींसाठी ज्याप्रमाणे कामे व्हायला हवीत, तशी होत नाहीत. या व्यक्तींसाठी असलेल्या संबंधित विभागांमधील अधिकारीही सामाजिक जबाबदारीपेक्षा नोकरी म्हणूनच काम करीत आहेत. त्यामुळे योजना असूनही विशेष व्यक्तींपर्यंत पोहोचत नाही, त्याचा त्यांना योग्य लाभ मिळत नाही आणि न्याय दिला जात नाही, असा खेद सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला. शहरातील बीड बायपास येथील लॉन्सवर आयोजित साहित्य व सांस्कृतिक मंडळ, पुणे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई (अपंग हक्क विकास मंच) यांच्या वतीने आयोजित ६ व्या अखिल भारतीय विशेष व्यक्तींच्या (अपंग) संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी विशेष सत्रात ते बोलत होते. यावेळी खा. सुप्रिया सुळे, माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, आ. हेमंत टकले, दीपा क्षीरसागर, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, स्वागताध्यक्ष सुहास तेंडुलकर, विजय कान्हेकर, डॉ. रवींद्र नांदेडकर, नीलेश राऊत, सचिन मुळे यांची उपस्थिती होती.संमेलनातील ठराव :१) केेंद्रशासनाच्या धर्तीवर राज्यात अपंगाची वेगळी रचना करावी. २) अपंग धोरणाची अंमलबजावणी करावी. ३) विशेष व्यक्तीतील साहित्यिकांची स्वतंत्र नोंदणी करावी. पुरस्कार वितरणउपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण शिवाजी गाडे व धर्मेंद्र सातव यांना करण्यात आले. संस्कार ग्रुप (पुणे) यांच्यातर्फे संस्कारभूषण पुरस्कार पीयूष द्विवेदी (साहित्य), गजानन वाघ (प्रशासकीय सेवा), कोमल बोरा (क्रीडा), चेतना अपंग मती विकास संस्था यांना देण्यात आला. तसेच तारामती बाफना अंध विद्यालय (औरंगाबाद) यांना अंधांसाठी उपयुक्त असणाऱ्या ब्रेन लिपीतील पुस्तकांची भेट देण्यात आली. यानंतर खंडेराव मुळे, राजेश ठाकरे, परिमल भट्ट, पवन खेबुडकर यांच्या यशोगाथेविषयी प्रकट मुलाखती घेण्यात आल्या. वर्षभर तरी गोड बोला सुप्रिया सुळे म्हणाल्या, नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. संक्रांतीचा सण आहे. आता काही निवडणुकाही नाहीत. तेव्हा सरकारने तीळगुळ घेऊन वर्षभर तरी गोड बोलावे, हे राजकीय व्यासपीठ नाही, असे म्हणत शुभेच्छा दिल्या.