शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

विशेष व्यक्तींना न्याय मिळेना

By admin | Updated: January 15, 2016 00:16 IST

औरंगाबाद : विशेष व्यक्तींसाठी ज्याप्रमाणे कामे व्हायला हवीत, तशी होत नाहीत. या व्यक्तींसाठी असलेल्या संबंधित विभागांमधील अधिकारीही सामाजिक जबाबदारीपेक्षा नोकरी म्हणूनच काम करीत आहेत.

औरंगाबाद : विशेष व्यक्तींसाठी ज्याप्रमाणे कामे व्हायला हवीत, तशी होत नाहीत. या व्यक्तींसाठी असलेल्या संबंधित विभागांमधील अधिकारीही सामाजिक जबाबदारीपेक्षा नोकरी म्हणूनच काम करीत आहेत. त्यामुळे योजना असूनही विशेष व्यक्तींपर्यंत पोहोचत नाही, त्याचा त्यांना योग्य लाभ मिळत नाही आणि न्याय दिला जात नाही, असा खेद सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केला. शहरातील बीड बायपास येथील लॉन्सवर आयोजित साहित्य व सांस्कृतिक मंडळ, पुणे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई (अपंग हक्क विकास मंच) यांच्या वतीने आयोजित ६ व्या अखिल भारतीय विशेष व्यक्तींच्या (अपंग) संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी विशेष सत्रात ते बोलत होते. यावेळी खा. सुप्रिया सुळे, माजी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, आ. हेमंत टकले, दीपा क्षीरसागर, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, स्वागताध्यक्ष सुहास तेंडुलकर, विजय कान्हेकर, डॉ. रवींद्र नांदेडकर, नीलेश राऊत, सचिन मुळे यांची उपस्थिती होती.संमेलनातील ठराव :१) केेंद्रशासनाच्या धर्तीवर राज्यात अपंगाची वेगळी रचना करावी. २) अपंग धोरणाची अंमलबजावणी करावी. ३) विशेष व्यक्तीतील साहित्यिकांची स्वतंत्र नोंदणी करावी. पुरस्कार वितरणउपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण शिवाजी गाडे व धर्मेंद्र सातव यांना करण्यात आले. संस्कार ग्रुप (पुणे) यांच्यातर्फे संस्कारभूषण पुरस्कार पीयूष द्विवेदी (साहित्य), गजानन वाघ (प्रशासकीय सेवा), कोमल बोरा (क्रीडा), चेतना अपंग मती विकास संस्था यांना देण्यात आला. तसेच तारामती बाफना अंध विद्यालय (औरंगाबाद) यांना अंधांसाठी उपयुक्त असणाऱ्या ब्रेन लिपीतील पुस्तकांची भेट देण्यात आली. यानंतर खंडेराव मुळे, राजेश ठाकरे, परिमल भट्ट, पवन खेबुडकर यांच्या यशोगाथेविषयी प्रकट मुलाखती घेण्यात आल्या. वर्षभर तरी गोड बोला सुप्रिया सुळे म्हणाल्या, नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. संक्रांतीचा सण आहे. आता काही निवडणुकाही नाहीत. तेव्हा सरकारने तीळगुळ घेऊन वर्षभर तरी गोड बोलावे, हे राजकीय व्यासपीठ नाही, असे म्हणत शुभेच्छा दिल्या.