शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
7
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
8
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
9
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
10
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
11
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
12
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
13
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
14
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
15
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
16
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
17
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
18
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
19
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
20
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर

कयाधू नदीच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष अभियान

By admin | Updated: September 13, 2014 00:09 IST

हिंगोली : जिल्ह्यातील कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेवून लोकसहभागातून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेवून लोकसहभागातून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी देशातील व राज्यातील विविध जल व पर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. विदर्भ - मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील एकमेव ‘कयाधू’ नदी ४० वर्षापूर्वी सातत्याने प्रवाहित होत होती. अलिकडच्या काळात किमान सहा महिने ती कोरडीच राहत आहे. या नदीच्या काठावर श्री संत नामदेव महाराजांचे समाधीस्थळ असलेले नर्सी हे गाव असून त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. श्री गुरूगोविंदसिंग यांच्या आदरस्थानी श्री संत नामदेव राहिल्यामुळे शीख धर्मियांचे हे पवित्र स्थान आहे. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते. तसेच जिल्ह्याचे ठिकाण असलेले हिंगोली शहरही याच नदीच्या तिरावर वसलेले आहे. त्यामुळे सदर नदीचे पुनरूज्जीवन करण्याचा कार्यक्रम राबविण्यासाठी नर्सीपासून विशेष अभियान हाती घेण्यात येणार आहे. या अभियानासाठी कयाधू नदी पुनरुज्जीवीका समिती स्थापन करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील नद्यांचे पुनरूज्जीवन करण्याच्या दृष्टीने रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. राजेंद्रसिंग राणा (तरुण भारत संघ राजस्थान) यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पॅटर्नचे जनक अभियंता सुरेश खानापूरकर, डॉ. द्वारकादास लोहिया (मानवलोक, अंबाजोगाई), महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. डी. एम. मोरे, सुनील जोशी (जलबिरादरी, पुणे), शांताराम पंदेरे, अभिजित घोरपडे, मुकुंद धाराशिवकर, डॉ. दत्ता देशकर, विनोद रापतवार यांच्या संयुक्त सहकार्याने हे अभियान राबविण्याचे ठरले आहे. या मोहिमेसाठी हिंगोलीतील कयाधू नदीची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंग राणा, डॉ. सुरेश खानापूरकर, डॉ. द्वारकादास लोहिया, शांताराम पंदेरे, सुनील जोशी ही तज्ज्ञ मंडळी १५ व १६ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यात येणार आहे, अशी माहिती कयाधू नदी पुनरूज्जीविका कार्यक्रमाचे समन्वयक जयाजी पाईकराव यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)