शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
2
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
3
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
4
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
5
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
6
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
7
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
8
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
9
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
11
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
12
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
13
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
14
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
15
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
16
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
17
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
18
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
19
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
20
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या

कयाधू नदीच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष अभियान

By admin | Updated: September 13, 2014 00:09 IST

हिंगोली : जिल्ह्यातील कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेवून लोकसहभागातून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

हिंगोली : जिल्ह्यातील कयाधू नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेवून लोकसहभागातून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी देशातील व राज्यातील विविध जल व पर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. विदर्भ - मराठवाड्याच्या सिमेवर असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील एकमेव ‘कयाधू’ नदी ४० वर्षापूर्वी सातत्याने प्रवाहित होत होती. अलिकडच्या काळात किमान सहा महिने ती कोरडीच राहत आहे. या नदीच्या काठावर श्री संत नामदेव महाराजांचे समाधीस्थळ असलेले नर्सी हे गाव असून त्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. श्री गुरूगोविंदसिंग यांच्या आदरस्थानी श्री संत नामदेव राहिल्यामुळे शीख धर्मियांचे हे पवित्र स्थान आहे. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते. तसेच जिल्ह्याचे ठिकाण असलेले हिंगोली शहरही याच नदीच्या तिरावर वसलेले आहे. त्यामुळे सदर नदीचे पुनरूज्जीवन करण्याचा कार्यक्रम राबविण्यासाठी नर्सीपासून विशेष अभियान हाती घेण्यात येणार आहे. या अभियानासाठी कयाधू नदी पुनरुज्जीवीका समिती स्थापन करण्यात आली आहे.महाराष्ट्रातील नद्यांचे पुनरूज्जीवन करण्याच्या दृष्टीने रेमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. राजेंद्रसिंग राणा (तरुण भारत संघ राजस्थान) यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पॅटर्नचे जनक अभियंता सुरेश खानापूरकर, डॉ. द्वारकादास लोहिया (मानवलोक, अंबाजोगाई), महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. डी. एम. मोरे, सुनील जोशी (जलबिरादरी, पुणे), शांताराम पंदेरे, अभिजित घोरपडे, मुकुंद धाराशिवकर, डॉ. दत्ता देशकर, विनोद रापतवार यांच्या संयुक्त सहकार्याने हे अभियान राबविण्याचे ठरले आहे. या मोहिमेसाठी हिंगोलीतील कयाधू नदीची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी डॉ. राजेंद्रसिंग राणा, डॉ. सुरेश खानापूरकर, डॉ. द्वारकादास लोहिया, शांताराम पंदेरे, सुनील जोशी ही तज्ज्ञ मंडळी १५ व १६ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यात येणार आहे, अशी माहिती कयाधू नदी पुनरूज्जीविका कार्यक्रमाचे समन्वयक जयाजी पाईकराव यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)